नांदेड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, अशी इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. "मला मुख्यमंत्री व्हायची घाई नाही.." असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा व्यक्त केली होती, त्यानंतर चव्हाणांनी हे व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं काम चांगल सुरू आहे. विरोधकांचा डाव यशस्वी होणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे औरंगाबादच्या नामांतरावरुन काँग्रेस शिवसेनेत कसलेही टोकाचे मतभेद नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न तर चव्हाण करत नाहीत ना असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भोकर येथील विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते.
जुगार, दारु आणि मटक्याचे अड्डे चालविण्यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व्यस्त असल्याचे त्यांचे नाव न घेता अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्याकडे विकास कामे करायला वेळ नाही...आपण हे अवैध जुगार, दारु आणि मटक्याचे अड्डे उध्वस्त करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना माझा पाठींबा आहे, असे व्यक्तव्य केले होते. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार यांनी यावर मिश्लिल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, त्यांना शुभेच्छा...मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर आपल्याला काय वाटत? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, जयंत पाटील यांना माझा पाठींबा आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील काय म्हणाले होते?
पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. का, असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल.
एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली होती. तसेच मला मुख्यमंत्रीपदा पेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावते, अशी भावनाही जयंत पाटलांनी केली यावेळी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.