राजकारणात सगळेच काचेच्या घरात राहतात...

काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये..
Sanjay Raut.jpg
Sanjay Raut.jpg

मुंबई : काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये...असा नियम आहे. कोणी कोणाकडे बोट दाखवू नये, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत त्यांनी आज सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे टि्वट केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. 

संजय राऊत म्हणाले,  "राजकारणात सगळेच काचेच्या घरातच राहतात...माझा कोणावरही रोख नाही." अभिनेता सुंशात सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या तपासाबाबात राऊत म्हणाले की मुंबई पोलिस सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत. याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त याबाबत अधिक बोलतील.

राम मंदिर भूमिपूजनाला तुम्ही जाणार का यावर ते म्हणाले की अयोध्या आणि आसपासच्या परिसरात सध्या कोरोनाचा कहर आहे. येथील परिस्थिती चिंताजनक आहे. मला वाटतं तिथे कमीत कमी लोकांनी जावं आणि तो रखडलेला सोहळा पूर्ण करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री नंतर जाऊ शकतात. त्यामुळे निमंत्रणासाठी कोणी थांबलेला नाही, सर्वांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. राम मंदिराबाबत शिवसेनेचे खूप योगदान आहे. भाजप, विश्वहिंदू परिषदेनेही मान्य केले आहे की बाबरी शिवसैनिकांनीच तोडली. त्यामुळे याबाबत शिवसेनेचे योगदान महत्वाचं आहे.


हेही वाचा : अमृता फडणवीस म्हणतात, "मुंबईने माणुसकी गमावली आहे, ती सुरक्षित राहिली नाही !'' 
 
मुंबई : निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई आता अजिबात सुरक्षित राहिली नाही अशी नाराजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनत चालला असून महाराष्ट्र आणि बिहारमध्येही कलगीतुरा सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मात्र, बिहारमधील भाजप, जेडीयू , राजद आणि कॉंग्रेससह सर्वच लहानमोठे पक्ष आता सुशांत आत्महत्याप्रकरणी प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

सुशांत आत्महत्याप्रकरणी आता अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज ट्‌विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमृता फडणवीस म्हणाल्या, की या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे. त्यावरून मला वाटते की मुंबईने माणूसकी गमावली आहे. निदोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई आता सुरक्षित राहिली नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com