पाषाणकरांचा अपहरण करणारा राजकीय नेता मंत्रालयात तळ ठोकून..

पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने संशयित राजकीय व्यक्तीचे नाव पोलिसांना काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र पोलिसांनी संबंधित राजकीय व्यक्ती मागील तीन दिवसांपासून मंत्रालयात बसून आहे.
gp29.jpg
gp29.jpg

पुणे : पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्याला बुधवारी (ता.28) वेगळेच वळण लागले आहे. त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याने शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने त्यांचे अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात बुधवारी पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे.

पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून 24 ऑक्‍टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. ते बेपत्ता झाल्यानंतर वित्त पुरवठा करणाऱ्या काही व्यक्तींची शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीही केली होती. दरम्यान पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने संशयित राजकीय व्यक्तीचे नाव पोलिसांना काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र पोलिसांनी संबंधित राजकीय व्यक्ती मागील तीन दिवसांपासून मंत्रालयात बसून आहे

यामुळे त्याची चौकशी करत आली नसल्याचे कपिल यांना सांगितले. मात्र कपिल यांनी बुधवारी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित राजकीय व्यक्तीचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनीही यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय कोणतीच माहिती देता येणार नसल्याचे सांगितले. आठ दिवस झाले मात्र अद्याप वडिलांचा काही ठिकाणा नाही. मी यापूर्वीच काही संशयित लोकांची नावे पोलिसांना दिली होती. त्यानुसार तपासासाठी पोलिसांना मदत होईल, अशी माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. तसेच याबाबत तक्रार दिली आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत, अशी माहिती कपिल यांनी दिली.

हेही वाचा : अंबरनाथमधील मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या

अंबरनाथ :  अंबरनाथ मधील पाले गावात असलेल्या पटेल आर मार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले अंबरनाथ शहराचे मनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बुधवारी सांयकाळी हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी राकेश पाटील यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सहा जणांनी केला असून ते दोन कार मधून आल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हि हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झाल्याचे कळताच अंबरनाथ सहाययक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी जवळील उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड पोलिसांना अलर्ट केले आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान  काही तासातच मुरबाड पोलिसांनी चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. आता दोन आरोपींच्या शोध कामी पोलीस लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com