..तर बेंगलूरूवर आमचा अधिकार...

मराठी माणसाचा सबंध दिल्लीपर्यत आहे, मग आपला कर्नाटकावर जास्त हक्क आहे, असेजयंत पाटील यांनी सांगितले.
jp31.jpg
jp31.jpg

गोंदिया : "कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बेंगलूरूवर आमचा जास्त हक्क आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्यविस्तार केला तो अगदी दिल्लीपर्यत गेला, जर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बेंगलूरूवर आपला अधिकार स्वाभाविक  आहे."

कर्नाटकचा संबध मुंबईशी कधी झाला नाही, मात्र मराठी माणसाचा सबंध दिल्लीपर्यत आहे, मग आपला कर्नाटकावर जास्त हक्क आहे, तेव्हा अशा प्रकारचे कर्नाटकने वायफळ बोलू नये असा सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमत्र्यांना दिला. 

भंडारा येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे शेतकरी आंदोलनावर ढोंग करीत असल्याचा आरोप केला होता, त्यावर बोलताना पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा शेतकऱ्यांशी काहीच
संबध नसून शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच ढोंग केला नसून उलट फडणवीस ढोंगी असल्याचे प्रत्युतर त्यांनी दिले. आगामी जिल्हा परिषद निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र
लढण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.  

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी 'बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे,' असं व्यक्तव्य केलं होते. या व्यक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले यांनी लक्ष्मण सवदी यांच्यावर टीका केली आहे. सवदी यांच्या व्यक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की कर्नाटकाचा मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही. कर्नाटकच्या जनतेला खुश करण्यासाठी त्यांचे हे अजब तर्क आहे.
 

हेही वाचा: पवार, ठाकरे, फडणवीस आज एकत्र येणार..
 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते आज सांयकाळी एकत्र जमणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा आज साखरपुडा आहे, यानिमित्ताने राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा आज सांयकाळी 7 वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com