सुप्रिया सुळे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
marathi2.jpg
marathi2.jpg

पुणे : "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे तिच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न आणि रंगनाथ पठारे समितीच्या अहवालाचा दाखलाही सुळे यांनी दिला आहे. आपण सर्वांनी मिळून हा विषय पूर्णत्वास नेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिक तसेच राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासनस्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यासंदर्भातील अहवाल सादर करूनही आता सात वर्षे उलटली आहेत. याशिवाय दरवर्षी मराठी साहित्य संमेलनासह अन्य कुठल्या ना कुठल्या साहित्यिक मेळाव्यात, बैठकीत, चर्चासत्रात हा विषय घेऊन शासनापर्यंत तो पोहोचवला जात असतो. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास तिला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळेल. देशातील तब्बल साडेचारशे विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि तिच्यातील ज्ञान आत्मसात करणे शक्य होईल. याशिवाय अन्य अनेक गोष्टींशी संबंधीत मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे सोपे होईल. या सगळ्या बाबींचा विचार करून केंद्र सरकारकडे हा विषय मांडणे अगत्याचे आहे. त्यासाठी राज्याचे प्रमुख या नात्याने आपण पाठपुरावा करावा. त्यासाठी आम्ही आणि आपले संपूर्ण राज्य आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी या पत्रातून दिली आहे.

हेही वाचा: राज्यकर्त्यांनाच मराठीचा विसर... 
 
मुंबई : राज्य सरकारच्या दिनदर्शिकेतून पौष, माघ, मार्गशीर्ष आदी मराठी महिने काढून टाकल्याप्रकरणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या या दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्यांबरोबच मराठी महिन्यांचाही उल्लेख करावा, असा कायदा आहे. मात्र, सुभाष देसाई मंत्री असलेल्या उद्योग विभागाच्या संकल्पनेतून काढलेल्या या दिनदर्शिकेत केवळ जानेवारी, फेब्रुवारी आदी इंग्रजी महिन्यांचाच उल्लेख आहे. यातील बाराही महिन्यांमध्ये राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मराठी महिने वगळण्यामागील बोलविता धनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हेच आहेत का, असाही टोला भातखळकर यांनी लगावला आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com