पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" माफी मागणार का..? आव्हाडांचा रोख कोणाकडे..

महाराष्ट्राला बदनाम करणारे "मराठी भय्ये" माफी मागणार का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
3J_20Awhad_201.jpg
3J_20Awhad_201.jpg

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. या तपासात सीबीआयला सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) मदत करीत आहेत. सीबीआयनं अखेर सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हा़ड यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणारे "मराठी भय्ये" माफी मागणार का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याबाबत आव्हाड यांनी टि्वट केलं आहे. 

जितेंद्र आव्हाड आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, "मराठी भैय्ये" आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयनं मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्रा आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का?
 
सुशांतच्या कुटुंबासोबतच काही राजकीय नेते, कलाकार, त्याच्या अनेक चाहत्यांनीही हत्येचा संशय व्यक्त केला होता. सुशांतला न्यायमिळण्यासाठी सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण हे हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होतं. आव्हाडांनी ‘मराठी भैय्ये’  असा शब्द कुणासाठी वापरला, यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. या तपासात सीबीआयला सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) मदत करीत आहेत. सीबीआयने अखेर सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचली आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com