महत्वाची बातमी : अकरावी प्रवेशासाठी 'या' तारखेपासून अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या २६ जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना याबाबतचा आदेश दिला आहे.
111th_20addmission_0.jpg
111th_20addmission_0.jpg

पुणे :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या २६ जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना याबाबतचा आदेश दिला आहे.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज भाग - एक भरणे आणि अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा,  मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे याबाबतची प्रक्रिया : २६ जुलैपासून सूरू  होत आहे.  विद्यार्थ्यांना स्वतः किंवा पालकांच्या मदतीने हा अर्ज भरता येणार आहे. 

विद्यार्थ्यांना मूळ अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये, अर्ज भरण्याचा सराव व्हावा, मुळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी सराव अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप संकेतस्थळावर सुविधा देण्यात येत आहे. त्यात भरलेली माहिती २४ जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी १६ जुलैपासून ते २४ जुलैपर्यंत संकेतस्थळावर Mock.Demo.Registration तपासता येणार आहे. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती http://dydepune.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


हेही वाचा :  विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 उल्लेख करण्यांवर कारवाई करण्याचे निर्देश 


मुंबई : कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.  

यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड19 चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com