अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी मोदींना पत्र...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा," अशी मागणी केली आहे.
1.jpg
1.jpg

पुणे : "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा," अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा," अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून "अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,"अशी मागणी केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, पोवाडे, लावण्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे मोठे योगदान होते. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये हातामध्ये डफ घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी लोकांना जागृत केले होते. त्यांची "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली." ही लावणी त्या काळामध्ये गावोगावी पोहोचली होती. 

अण्णा भाऊंच्या अशा अनेक लावण्यानी लोकांचे समाजमन हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जागृत केले होते.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या राजकीय कार्याची सुरुवात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून केली होती. तसेच त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाने सुरू केलेल्या एका साप्ताहिकाचे बातमीदार म्हणूनही काम केले होते. त्या काळामध्ये त्यांनी अनुभवलेली पाहिलेली माणसं मराठी साहित्यात आणली.

 हातावर पोट असणारी माणसं त्यांच्या साहित्याची नायक बनली. त्यांनी सामान्य माणसाचे जगणे मराठी साहित्यात आणले अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यात योगदान देऊन आणि कष्टकरी लढ्यात सहभाग नोंदवूनही त्यांची घोर उपेक्षा झाली आहे. हे वर्ष अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

हेही वाचा :  परीक्षा रद्द करण्याबाबत आठवलेंचे राज्य सरकारचा पत्र..

 मुंबई : कोरोनाच्या संकट काळात इयत्ता नववी आणि आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही. त्याऐवजी परीक्षा रद्द कराव्यात. परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पाठवावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ओव्हरसिज स्कॉलरशिप मिळालेले मागासवर्गीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यांना स्कॉलरशिपचा दुसरा हप्ता अद्याप न मिळाल्याने परदेशात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यांना महाराष्ट्र्र राज्य सरकारने त्वरित  स्कॉलरशिप चा दुसरा हफ्ता द्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. त्याबाबत रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठविले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com