संजय राठोडांकडून पाच कोटी घेतल्याच्या आरोपानंतर पूजाच्या वडिलांनी उचलले हे पाऊल....

शांताबाई राठोड सध्या चर्चेत आहेत...
lahu chavan-pooja chavan
lahu chavan-pooja chavan

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण रोज नव्या वळणावर जात आहे. पूजाच्या नातेवाईक शांतबाई राठोड यांनी, काल पूजाच्या कुटुंबीयांनी पाच कोटी रुपये संजय राठोड यांच्याकडून घेतले आहेत. त्यामुळे ते बोलत नाहीत असा, आरोप केला होता. या आरोपावर बोलताना पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी थेट आज (मंगळवार ता.२ मार्च) परळी पोलिस ठाण्यात, शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीतून शांताबाई राठोड यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

दरम्यान, लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिल्याने, आता पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण काय वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शांताबाई विरोधात परळी शहर ठाण्यात एनसी (अदलखलपात्र) दाखल झाली आहे. 

दुसरीकडे पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप पूजाच्या कथित  नातेवाईक शांताताई राठोड यांनी केला आहे. माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा, असे आवाहन शांताताईंनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केले आहे. माझ्याविरोधात तक्रार दाखल झाली. हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढा देत आहे.मी पुण्यात जाऊन तक्रार दिली म्हणून झळ लागली. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात,असे त्यांनी लहू चव्हाण यांना उद्देशून  म्हटले आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिच्या कुुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत असल्याने, पुणे येथील वानवडी पोलिस ठाण्यात व वाशिमच्या मानोरा पोलिस ठाण्यात भाजप नेते व प्रसारमाध्यमांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे बंजारा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.  

पुणे येथील वानवडी पोलिस ठाण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे निरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार अतुल भातखळकर, युवा मोर्चा पुणे शहर आणि इतर अनेक गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅंड. रमेश खेमू राठोड यांनी केली आहे. 

पीडित कुटूंबाला पोलिस संरक्षण देण्याचाचीही मागणी करण्यात आली आहे. फ्लॅट बंद असतांना मोबाइल आणि लॅपटॉप मधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर कशी गेली, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांनाही पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे.

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची मागील अनेक दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजप नेते आणि प्रसारमाध्यमे रोज बदनामी करीत असल्याने आम्ही त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यासाठी मानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावेत; अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा श्याम राठोड यांनी या वेळी दिला.  

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली जात होती. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com