पालकांशी संवाद साधल्यानंतर 'हा' निर्णय घेणार...

राज्यातल्या पालक संघटनांशी आम्ही संवाद साधून त्या बद्दलचे निर्णय घेतले जाणार आहे. शिक्षक आमदारांशी संवाद साधला आहे. येत्या सोमवारी विरोधी पक्षांशीही याबाबत संवाद साधणार असल्याचे गायकवाड यांनीनमूद केले.
Varsha Gaikwad
Varsha Gaikwad

मुंबई : विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा शैक्षणिक सत्र सुरु करतानाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्याबाबत पालकांशी चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यातल्या पालक संघटनांशी आम्ही संवाद साधून त्या बद्दलचे निर्णय घेतले जाणार आहे. शिक्षक आमदारांशी संवाद साधला आहे. येत्या सोमवारी विरोधी पक्षांशीही याबाबत संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वर्षी माणुसकी या धाग्यावर सर्व व्यवहार होतील असे सांगितले. हे दोघेही महासेवा या रमेश प्रभू आणि करण नाईक यांनी सुरू केलेल्या संवादात बोलत होते. मुले समुहात वावरतील, शौचालये वापरतील त्यामुळे या संदर्भात अत्यंत सावध पावले टाकली जातील, मुलांबाबत पालक उत्तम निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेतले जाईल, असेही गायकवाड म्हणाल्या. शाळांनी शुल्क वाढवायचे नाही, असे शाळांना कळविले आहे. 

पालकांना काही तक्रार असतील तर मंचावर त्यांनी तसे कळवावे, असेही त्या म्हणाल्या. सॅनिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५ टक्के अनुदानाची रक्कम आधीच वितरीत करण्याचे निश्चित केले आहे, असेही त्या म्हणाल्या. रेड झोनमधील शिक्षक जर ग्रीन झोनमध्ये शिकवण्यासाठी गेले तर त्यांचे विलगीकरण कसे करता येईल, याचाही सविस्तर विचार करावा लागेल असेही त्या म्हणाल्या.

ही बातमी वाचा : शेखर गोरेंना विधानपरिषदेवर घेण्याच्या हालचाली
 

बिजवडी (ता. माण) : विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी रिक्त झालेल्या चार जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. यासाठी शिवसेनेमधील अनेक मातब्बर मंडळी इच्छुक असून अनेकांनी पक्ष प्रमुखांसह वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून जोरदार फिल्डींग लावली आहे. यात माण-खटावचे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्याही नावाची चर्चा आहे. माण मतदारसंघासह जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचा विधानसभेतील पराभव भरून काढला जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शेखर गोरे यांचे जवळचे संबंध आहेत. एक आक्रमक व्यक्तिमत्व व दुष्काळी भागातील जनतेची टँकरच्या माध्यमातून तहान भागवणारा, स्वखर्चाने विविध विकास कामे करणारा नेता म्हणून शेखर गोरेंची राज्यभर ओळख आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेखर गोरेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून माण विधानसभा मतदारसंघासाठी शेखर गोरेंची उमेदवारी जाहीर केली होती. राज्यात शिवसेना- भाजपा युती झाल्यानंतर माण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेला. तरीही पक्ष प्रमुखांनी शेखर गोरेंना दिलेला शब्द माघारी घेतला नाही. शेखर गोरेंचे कार्य पाहून त्यांना शिवसेनेचीच उमेदवारी देत दिलेला शब्द खरा करून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com