सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली मध्ये शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे. त्याठिकाणी केंद्र सरकारने विचारपूस करणे गरजेचे होते.. पण तसे न करता त्यांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून पाप केले आहे. हुकूमशाही पद्धतीने मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केले. सांगलीमध्ये ते बोलत होते..
नाना पटोले यांची काल काँग्रेसच्या प्रदेशाअध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावर कदम म्हणाले की नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्याठिकाणी कोण अध्यक्ष होणार हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ ठरवतील. ते पद काँग्रेस पक्षाचे आहे.. जर कोणाचे काही म्हणणे असेल त्यांनी मत मांडावे.
हेही वाचा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिहानाला १८ कोटी...
नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. आता नवीन माहिती उघडकीस येत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, टि्वट करण्यासाठी रिहानाला २.५ मिलियन डॉलर (१८ कोटी रुपये) दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे या आंदोलनामागे कुणाचा हात आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. रिहानाला १८ कोटी देण्यामागे कॅनडातील पोएटिक जस्टीस फाऊंडेशनचा हात असल्याची चर्चा आहे.
रिहानाच्या विरोधात क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात उतरला होता. सचिननं या प्रकरणी केलेल्या ट्विटनंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. याचवेळी जगप्रसिद्ध टेनिसस्टार मारिया शारापोवा हिची माफी मागण्याचे सत्र भारतीयांकडून सोशल मीडियावर सुरू झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.