भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या सरकारचेच टोचले कान

बेळगाव प्रश्नावरून कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी निषेध केला आहे.
BJP State president Chandrakant patil slams Karanataka BJP leaders over belgaon issue
BJP State president Chandrakant patil slams Karanataka BJP leaders over belgaon issue

सोलापूर : बेळगाव प्रश्नावरून कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी निषेध केला आहे. कर्नाटकमधील आमचे नेते जे करत असलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठी भाषिक 842 गावे आपल्या भूभागासह महाराष्ट्रात आलीच पाहिजेत, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

बेळगावच्या सीमावादावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुक्ताफळे उधळली. मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तर एका मंत्र्याने महाराष्ट्र एकीकरण समितीवरच बंदी घालण्याचे वक्तव्य केले आहे. यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रहार केला आहे.

आता राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कर्नाटकमधील भाजप नेत्यांचा आम्ही निषेध करतो. कर्नाटकमधील आमचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाही.

मराठी भाषिक 842 गावे आपल्या भूभागासह मराठी भाषिक महाराष्ट्रात आलेच पाहिजे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचा निर्णय होईल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी राज्य सरकार कर्नाटक सीमा वाद आणला जातोय, असा आरोपही पाटील यांनी केला. 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी बेळगाव महाराष्ट्रात घेणारच, अशी गर्जना केली. तसेच सीमावादाचा प्रश्न संपेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडले होते. बेळगाव सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असूनही कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर केले. हा उर्मटपणा आहे. हे सरकार बदललेल्या नावाप्रमाणेच बेलगाम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला होता. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com