औरंगाबाद ः महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून लोकशाहीची व्याख्याच बदली आहे. लोकशाही म्हणजे काय? असा प्रश्न मला एका कार्यकर्त्याने विचारला होता, तेव्हा ५६ आमदार असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, ५४ आमदारांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आणि ४४ आमदार असलेल्या पक्षाचे मंत्री होतात, आणि १०५ आमदार असलेला पक्ष विरोधी पक्षात बसतो, यालाच लोकशाही म्हणतात, असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे आयोजित मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी भाजप आणि फडणवीस यांना जोरदार चिमटा काढला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वर्ष पुर्ण होत असल्याचे निमित्त साधत मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले.
धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतांना भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. पण शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्वाने ते उधळून लावले. आम्ही भाजपला सांगत होतो, बाबांनो असे करू नका, पवार साहेबांचा नाद करू नका, पण त्यांनी ऐकले नाही.
पवार साहेबांची काठी अशी बसते की भल्याभल्यांना ती कशी बसते हे लवकर कळतच नाही. भाजपला ते आता कळाले असेल. राज्यात जसं आपण कोरोनापासून आपल्या कुटुंबाच रक्षण करतोय, तसंच आता भाजपच्या संसर्गपासून देखील आपल्याला दूर राहावे लागेल, असा चिमटा देखील मुंडे यांनी काढला.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.