सातारा : भाजप शिखर गाठत असताना त्या पक्षाचा पाया मात्र खचत चालला आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर खासदार छत्रपती उदयनराजेंनी प्रतिक्रिया देणे टाळले. कुणाच्या प्रतिक्रियांवर भाष्य करायला मी मोकळा नाही, असे सांगत त्यांनी हा मुद्दा उडवून लावला. केवळ राजकारणा मुळे भाजपचे सरकार होऊ शकले नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केली.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज उदयनराजेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी उदयनराजेंनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. राज्यात लवकरच लोकहिताचे एकच उद्दीष्ट असलेले सरकार स्थापन होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबद्दल मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.
उदयनराजे म्हणाले, "आपण सर्वसामान्य माणसांचा विचार केला पाहिजे. ज्यांनी आपल्याला मतदान केले त्यांची ससेहोलपट होते आहे. सर्व दिशाहिन आहेत. सरकार कुणाचेही असो, स्थिर असले तर चांगला कारभार होऊ शकतो. वेगवेगळ्या विचाराचे लोक स्वार्थासाठी एकत्र येतात, त्यावेळी प्रत्येकाचे विचार वेगळे असल्याने एका निर्णयापर्यंत येणे अवघड असते. त्यावेळी आपापले हेतू साध्य झाल्यावर आपापल्या मार्गाने निघून जातात. जेव्हा विचाराने लोक एकत्र येतात तेव्हा एकत्र ठेवण्यासाठी ताकद लावावी लागत नाही. कारण त्यांचे उद्दीष्ट लोकहिताचे असते. हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. मला खात्री आहे की लवकरच चांगले घडेल. लोकांचे प्रश्न मार्गी लागेल," यावेळी उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांना उद्देशून शुभेच्छाही दिल्या.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.