राज्यपालांनी केले अस्खलित मराठीत भाषण

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांकडून सायकल रॅली काढण्यात आली होती.
23koshiyari.jpg
23koshiyari.jpg

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरवात झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकमेंकांविरूद्ध घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांकडून सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अस्खलित मराठीत अभिभाषण केलं. 

"कोरोना काळात राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या 500 प्रयोगशाळा कार्यरत आहे. कोरोनाविरूद्ध आजही लढा सुरू आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले. कोरोना योद्धाचे राज्यपालांनी आभार मानले.

"कोविडकाळात विशेष सर्वेक्षण करण्यात आली आहे. राज्याला केंद्र सरकारकडून 29 हजार कोटींचा जीएसटी परतावा येणे बाकी आहे. कोरोना काळात राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या.  शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे," असे राज्यपालांनी सांगितले.   
  
राज्यपाल म्हणाले की, सीमा भागातील रहिवाश्यांना न्याय मिळवून देण्यास माझं सरकार तयार आहे. कोविडची संख्या कमी करून धारावी येथे उत्तम काम माझ्या सरकारने केलं आहे कोविड या संसर्गजन्य साथीवर सरकार नियंत्रण मिळवत आहे. 35 टक्के महसूल यावर्षी कमी आहे . अडीच लाख शेतकऱ्याना 750 कोटी रुपयांचे अन्नधान्य पुरवलं आहे. शिवभोजन योजनेत 3 कोटी 15 लाख नागरिकांनाना लाभ मिळाला आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवनात आले.

कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. अनेकांना मोठ्या वेतनकपातीचा सामना करावा लागतो आहे. छोटे व्यापारी, लघु व मध्यम बंद झाल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच इंधन आणि गॅस दरवाढीमुळे या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com