राष्ट्रवादीच्या या आमदाराने आपला राहता बंगला क्वारंटाईनसाठी दिला...

सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने योग्य निर्णय
bhalke
bhalke

पंढरपूर : सोलापूरनंतर आता पंढरपुरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच बाहेर गावाहून आलेल्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे राष्ट्रवादीचे  आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला दुमजली बंगला क्वारंटाइनसाठी देण्याचे  जाहीर केले आहे. तसे त्यांनी प्रशासनाला पत्र देखील दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एका आमदाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लोकांसाठी आपला राहता बंगला खाली करून दिला आहे. आमदार भालके यांच्या सामाजिक दातृत्वाचे जिल्ह्यात  स्वागत केले जात आहे. भालके कुटुंब हे पंढरपूरपासून सारकोली येथे वास्तव्यास आहे. भालकेपण तेथे राहतात. त्यांनी पंढरपुरात बंगला बांधला आहे. तो आॅफीस म्हणून आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आणि इतर कामासाठी वापरला जातो.

पंढरपूर शहराची सुमारे सव्वा लाख लोक संख्या आहे. त्यातच शहरात कोरोनाबाधित रूग्ण संख्या वाढू लागली आहे.पुणे, मुंबईसह इतर राज्यांतून आतापर्यंत सुमारे जवळपास सहा हजारांहून अधिक लोक शहर व तालुक्यात आले आहेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील मठ,धर्मशाळा आणि मठामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना  विलगीकरण केले आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहाता,आमदार भारत भालके यांनी आज आपला राहाता बंगला लोकांसाठी खाली करून देणार असल्याचे जाहीर केले. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास 100 हून अधिक  बेड बसतील.यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करून देऊ, असे ही त्यांनी सांगितले.

सोलापुरात 66 जणांचा बळी

सोलापूर : दिवसेंदिवस कोरानाचे संकट वाढत आहे. कोरानाशी मुकाबला करताना प्रशासकीय यंत्रणापण हतबल झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याही कोरोनाच्या संकटात सापडला आहे. येथील कोरानाचे संकट कधी टळेल, यांच्या उत्तर लोकप्रतिनिधी जवळ आहे ना प्रशासकीय यंत्रणेकडे. आज किती रूग्ण वाढले, त्यांची चर्चा करणे एवढेच सोलापुरकरांच्या हाती आहे. 

महाराष्ट्रात कोरोना पहिला रूग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर ता. 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरानाचा पहिला रूग्ण आढळला. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो कोराना पॅाझिटिव्ह आढळला. अन् सोलापुरकरांचा चिंतेत वाढ झाली. गेल्या 45 दिवसामध्ये सोलापुरात कोरानामुळे 66 जणांचा बळी गेला.  

कोराना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व अन्य रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. संशयीत अनेक जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, यातील 538 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. या अहवालाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.  

सुमारे 538 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतीच दिली. एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असताना, कोरोना तपासणीच्या अहवाल येण्यास इतका उशीर का, या अहवालातून आणखी किती जण पॅाझिटिव्ह येतील, असा प्रश्न सोलापुरकरांसमोर आहे. 

एकीकडे कोराना रूग्णालयात पेंशटची गैरसोय होत असल्याचे सोशल मीडियावर चर्चा होत आहे, तर दुसरीकडे कोराना संशयीतांना क्वारंटाइन केले असता, त्या क्वारंटाइन केंद्रात दाखल झाल्यानंतर काही पेशंटचे अहवाल पॅाझिटिव्ह येत आहेत. याला जबाबदार कोण ? अशी चर्चा होत आहे. बुधवारी तीन जणांचा कोरानामुळे सोलापुरात मृत्यू झाला. सोलापुरात मृत्यूची टक्केवारी 9.89 टक्के आहे. ही टक्केवारी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com