सरपंचताईंनी दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधली भावाला राखी 

सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माहुली गावच्या सरपंच सिंधुताई माने यांनी सोमवारी (ता. 3 ऑगस्ट) आपल्या भावाला जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन राखी बांधली. त्यांचे भाऊ प्रकाश कणसे हे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आले आणि त्यांनी राखी बांधून घेतली. या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Sarpanch tied the rakhi to the brother on the border of two districts
Sarpanch tied the rakhi to the brother on the border of two districts

पुणे : सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माहुली गावच्या सरपंच सिंधुताई माने यांनी सोमवारी (ता. 3 ऑगस्ट) आपल्या भावाला जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन राखी बांधली. त्यांचे भाऊ प्रकाश कणसे हे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आले आणि त्यांनी राखी बांधून घेतली. या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

सातारा जिल्ह्यातील मायणी आणि सांगली जिल्ह्यातील माहुली या दोन गावातील अंतर अवघे पाच किलोमीटर आहे. सांगली-बारामती मार्गावर ही दोन गावे आहेत. जिल्ह्याची सीमा असल्याने कोरोना लॉकडाउनपासून दोन्ही बाजूंनी पोलिसांच्या चौक्‍या बसविण्यात आलेल्या आहेत. सोमवारी रक्षाबंधनाचा सण होता. या सणाला सिंधुताई यांना भाऊ प्रकाश कणसे यांना भेटायला जायचे होते. 

पण, लॉकडाउनमध्ये जिल्हा प्रवेश बंदीचा नियम असल्यामुळे त्यांना सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात जाता येत नव्हते. मग, त्यांनी भावाला मायणीच्या सीमेवर बोलावून घेतले. तिथे पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी भावाला राखी बांधली. या वेळी त्यांनी तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना सुद्धा राख्या बांधल्या. ते पाहून पोलिस कर्मचारीही भारावून गेले. 

सिंधुताई माने यांना या बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले,"सरकारने जे नियम केले आहेत, ते आपल्या हितासाठीच आहेत. आपण ते पाळले पाहिजेत. बहिणीच्या हृदयात भावाबद्दलचे प्रेम कायमच असते. त्याला आपण घरी जाऊन राखी बांधली काय आणि बाहेर बांधली काय? काहीही फरक पडत नाही. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत, त्या पाळून आम्ही रक्षाबंधन साजरे केले. सर्वांनी सरकारच्या सूचना आणि नियम पाळा,' असे आवाहन त्यांनी केले. 

या आगळ्या वेगळ्या रक्षा बंधनाच्या कार्यक्रमा वेळी विलासराव सोमदे, काकासाहेब माने, प्रदीप माने उपस्थित होते. 
 

हेही वाचा : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता 

मंचर (जि. पुणे) : मुंबई येथे मंगळवारी (ता. 4 ऑगस्ट) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.

या रेल्वेच्या माध्यमातून पुणे, नाशिक शहरांसह पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. या लोहमार्गावरून प्रवासी वाहतुकीसह कृषी उत्पादने आणि माल वाहतुकीलाही परवानगी असणार आहे. 

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा "महारेल'च्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. 

या वेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधींसह "महारेल'चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि व्हिसीद्वारे उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com