नीलमताईंनी चंद्रकांतदादांना आव्हान देणे हास्यास्पद - संदीप खर्डेकर

चंद्रकांतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्वमान्य नेते आहेत - सातत्याने मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या नीलमताई गोऱ्हे यांनी दादां वर टीका करताना किमान आपली पूर्वपीठिका तपासून पाहणे गरजेचे वाटते, अशी टीका पुणे भाजपचे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली.
Chandrakant Patil - Neelam Gorhe
Chandrakant Patil - Neelam Gorhe

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ५ जिल्ह्यातील मतदार मतदान करत असतात,पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा ,कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अश्या ५ जिल्ह्यातून पदवीधर ची निवडणूक लढवून दोन वेळा विजयी झालेले चंद्रकांतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्वमान्य नेते आहेत - सातत्याने मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या नीलमताई गोऱ्हे यांनी दादां वर टीका करताना किमान आपली पूर्वपीठिका तपासून पाहणे गरजेचे वाटते, अशी टीका पुणे भाजपचे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली.

भारतीय जनता पार्टीचे नेते रोजच सरकारवर टीका करीत आहेत.राज्य सरकार सक्षम आहे. सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता आणखी वाढत आहे. राम कदम यांच्यासारखे लोकही टीका करीत आहेत. हिंमत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल दिले होते. 

त्याला उत्तर देताना खर्डेकर म्हणाले, "मी या निवेदनाद्वारे नीलमताईंच्या निदर्शनास आणून देउ इच्छितो की  चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मधून मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त शक्तीला (?) तोंड देउन बहुमताने निवडून आले आहेत.त्यांच्या पराभवासाठी जाणत्या राजां सह राज्यातील अनेक नेते जीवाचे रान करत होते - तरीही चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  लक्षणीय विजय नोंदविला. त्यामुळे चंद्रकांतदादां ना कोथरूड मधून पुन्हा निवडून येउन दाखवा असे आव्हान देताना नीलमताई स्वतः जनतेतून कधी निवडणूक लढविणार हे त्यांनी स्पष्ट करावे आणि मग सलग तीन वेळा जनतेतून निवडून आलेल्या चंद्रकांतदादांना आव्हान द्यावे,''

''नीलमताईं नी दरबारी राजकारण सोडावे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी अभाविप च्या प्रचारक पदापासून आजपर्यंत जो कार्यकर्त्यांचा मोहोळ उभा केला आहे त्याचा आदर्श घ्यावा आणि जनतेत काम करावे - नपेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलां वरील अत्याचारात झालेली वाढ याबाबतीत आत्मपरीक्षण करावे आणि या सरकारच्या काळात महिलांना जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही याबाबतीत आंदोलन उभारावे,'' असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com