शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयु‘ चा काठ 

शिवसेनेची हीमहाआरती संपुर्ण देशात कायम चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे नाशिक शिवसेनेकडेच त्याचे नियोजन व जबाबदारी असल्याने अयोध्येत श्रीराम मंदीर मंदीराची मुहूर्तमेढ रोवली जात असताना येथील शिवसैनिकांना त्याविषयी अभिमान व्यक्त केला आहे.​
शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयु‘ चा काठ 

नाशिक : अयोध्येत श्रीराम मंदीर झालेचं पाहिजे अशी ठाम भुमिका  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती.  भाजपच्या रथ यात्रेला त्यावेळी शिवसैनिकांची मोठी कुमक मिळाली. बाबरी मशीद ढासळल्यानंतर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असे सांगणाया बाळासाहेबांच्या शिवसेनेने गेल्या दोन वर्षांपासून अयोध्येतील शरयु नदीच्या किनारी महाआरती करून राम मंदीराचा विषय कायम तेवत ठेवला.  

काल झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील शिवसेना पदाधिका-यांनी त्या उपक्रमांना उजाळा दिला. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेकडून शरयु नदीच्या किनारी श्रीराम आरतीचे आयोजन केले जाते. शिवसेनेची ही महाआरती संपुर्ण देशात कायम चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे नाशिक शिवसेनेकडेच त्याचे नियोजन व जबाबदारी असल्याने अयोध्येत श्रीराम मंदीर मंदीराची मुहूर्तमेढ रोवली जात असताना येथील शिवसैनिकांना त्याविषयी  अभिमान व्यक्त केला आहे. 

श्रीरामाचे नाशिकच्या पंचवटीमध्ये वास्तव्य होते. नाशिकला पौराणिक काळापासून महत्व आहे. आजही त्याचा धार्मिक संदर्भ नाशिकमधील विविध स्थळांना दिला जातो. प्रत्येकाच्या जिवणाशी ते एकरुप झालेले आहे. शिवसेनेच्यावतीने अयोध्येत महाआरतीचा कार्यक्रम करताना नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडेच त्याची जबाबदारी सोपविली जाते. फेब्रुवारी २०१८ मध्ये शिवसेनेने अयोध्येत महाआरतीचा कार्यक्रम घोषित केला. त्यावेळी नियोजनासाठी जी टीम तयार करण्यात आली, त्यात शिवसेनेचे संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, गटनेते विलास शिंदे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता.

शरयु नदीची आरती, आरतीचा पंचागानुसार मुहूर्त, शासकीय परवानगी, व्हीआयपी नेत्यांचे वास्तव्य, कार्यक्रमाचे नियोजन, साधु-महंतांना निमंत्रणे, पुजारी आदी नियोजन महाआरतीच्या आठ दिवस आधी करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हातून आरती झाल्यानंतर मिळालेले समधान आयुष्यभर विसरता येणार नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. पहिल्या वर्षाचे यशस्वी नियोजन झाल्यानंतर दुसया वर्षी म्हणजे मार्च २०१९ मध्ये पुन्हा याच प्रमाणे नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या टिमवर सोपविण्यात आली होती. 

महाआरतीवर नाशिकची छाप 
एकीकडे आठ दिवस अगोदर नियोजन करताना नाशिकमधून शिवसेना कार्यकर्त्यांना अयोध्येत नेण्यासाठीच्या नियोजनाची जबाबदारी देखील पदाधिका-यांवर होती. पहिल्या वर्षी विशेष  रेल्वे गाडीने अयोध्येकडे रवाना झाले. त्यात १६०० शिवसेना कार्यकर्ते होते. दुस-या वर्षी बसेसचे नियोजन केले होते. त्यामुळे शरयु नदीच्या महाआरतीच्या कार्यक्रमात नाशिकमधील शिवसैनिकांची छाप दिसून आली. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com