Ekanath Khadse - Devendra Fadanavis
Ekanath Khadse - Devendra Fadanavis

..तुम्हाला पुन्हा येईन, पुन्हा येईनच करत बसावे लागेल!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या महाविकास आघाडी सरकारचीपाच वर्षे असेच निघून जातील. त्यांना'पुन्हा येईन, पुन्हा येईन' करतच रहावे लागेल, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

जळगाव : महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ती अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या महाविकास आघाडी सरकारची पाच वर्षे असेच निघून जातील. त्यांना 'पुन्हा येईन, पुन्हा येईन' करतच रहावे लागेल, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन  केले

फडणवीसांना टोला

एकनाथ खडसे यांनी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.खडसे म्हणाले, "आता राज्यातील राजकारण बदलत आहे. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण हे सरकार टिकणार आहे. कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून हे सरकार पडणार आहे, आपण सत्तेत येणार आहोत, असे विरोधकांना सांगावे लागत आहे. त्यांना पुन्हा येईन, पुन्हा येईन करतच रहावे लागेल,'' यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली. हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही खडसेंनी फडणवीस यांना लगावला.

कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा वाढेल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा. टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जे आमच्यावर टीका करतात ते गावातच असतात. ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही, ते नाथाभाऊचे नाव घेतात, असे सांगत खडसेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

वर्तमानपत्रात कधी काही आले तर पॅनिक होऊ नका. वर्तमानपत्रात कधी चांगले तर कधी वाईट येते. वर्तमानपत्रात कधी काय येते, याचा मला गेल्या ४० वर्षांत चांगला अनुभव आहे. आपलं काम सोडू नका. आपल्याला एकजुटीने काम करायचे आहे, असेही खडसे म्हणाले.

बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार मनीष जैन, अरुण पाटील, दिलीप वाघ, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com