खडसेंचा हात लागलेले प्रकल्प गेल्या पाच वर्षात रोखले

ज्या प्रकल्पाचे एकनाथ खडसे यांनी उद्घाटन केले त्या प्रकल्पाकडे गेल्या पाच वर्षात हेतुपुरससर दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे जलसपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
Jayant Patil - Ekanath Khadse
Jayant Patil - Ekanath Khadse

जळगाव : ज्या प्रकल्पाचे एकनाथ खडसे यांनी उद्घाटन केले त्या प्रकल्पाकडे  गेल्या पाच वर्षात हेतुपुरससर दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे जलसपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी परिवार  परिसंवाद या अंतर्गत ते आज अमळनेर तालुक्यात आहेत. या ठिकाणी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पडलसरे धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हा अधक्ष अॅड.रवींद्र पाटील आदी. उपस्थित होते .या वेळी त्यांनी धरणाच्या रखडलेल्या कामाची माहिती  घेतली अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, ''गेल्या पाच वर्षात या धरणाचे  कोणतेहि काम. झाले नाही. याचीही जनतेने नोंद घ्यावी. एकनाथ खडसे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे ते भाजपने हेतुपुरस्सर रखडवले.नमात्र आता आपले सरकार आले आहे.नया धरणासाठी निधी उलब्ध करून अडीच वर्षात धरणाचे काम पूर्ण करून ज्यांच्या हस्ते शुभारंभ झाला त्यांच्याच हस्ते पूर्णत्वाचे उद्घाटन करण्यात येईल व धरणात पाणीसाठा साठा करून शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल.''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com