शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, पण खात्यात रक्कम जमा करताना लागतेय कात्री

आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्‍कम वळती करण्यात येत आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्जापेक्षा कमी रक्कम आल्याने एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
Farmer Vidarbha
Farmer Vidarbha

नागपूर : यापूर्वीच्या युती सरकारमध्ये असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरले होते. आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली. योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून थकबाकीची रक्कम जमा करताना कात्री लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असे जर होत असेल तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा कसा कमी होणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली होती. या योजनेनुसार दीड लाख रुपये सरकार देणार होती व त्यावरील रक्कम शेतकऱ्यांना द्यायची होती. वरील रक्कम भरल्यावर दीड लाख रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार होते. शेतकऱ्यांना रांगेत लावण्यात आले असून ही योजना फसवी असल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाआघाडीची सत्ता आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची योजना आणली. दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

कर्जदारांची नावे बॅंकेकडून घेवून पात्र शेतकऱ्यांची यादी काही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्‍कम वळती करण्यात येत आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्जापेक्षा कमी रक्कम आल्याने एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अश्‍विनी मो. घाडगे असे शेतकऱ्याचे नाव आहे. कळमेश्‍वर तालुक्‍यातील मौजा उबगी येथे त्यांचे शेत आहे. 

बॅंक ऑफ इंडिया, कळमेश्‍वर शाखेतून जून 2016 ला 50 हजार रुपयांचे कर्ज घाडगेंनी घेतले होते. 30 सप्टेंबर 2019 रोजी त्यांची थकित रक्‍कम 67 हजार 711 रुपये होती. तशी माहितीही सरकारला देण्यात आली. आधार प्रमाणिकरण झाल्यावर प्रत्यक्षात 57 हजार रुपयेच खात्यात जमा झाले. थकित कर्जाच्या रकमेच्या पेक्षा जवळपास 10 हजार रुपये कमी जमा झाले. सरकारकडून पैसा कमी देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. माफीची अंमबजावणी होण्यास विलंब होत असल्याने निश्‍चित मुदतीनंतर व्याजाची रक्कम न आकारण्याच्या सूचना सराकरने बॅंकांना केल्या. परंतु बॅंकांकडून व्याजाची आकारणी होत आहे. माफीच्या रकमेनंतर संबंधित शेतकऱ्यावर 15 हजार रुपये थकबाकी दाखविण्यात येत आहे. जी की 10 हजार रुपये पाहिजे होती. शेतकऱ्यांने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे.   (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com