केंद्रातील मंत्र्यांच्या कामाचे अनुकरण करण्यासाठी रोहित पवार त्यांना भेटतात

आमदार रोहित पवार यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी अहमदनगर जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
Arun Munde bjp.jpg
Arun Munde bjp.jpg

अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडच्या विकासासाठी निधी आणत आहेत. त्यातून नवनवीन योजना मतदार संघात राबविल्या जाणार असल्याचे राष्ट्रावादी काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत. या विकासाच्या रथाला आणखी गती मिळावी तसेच मतदार संघात पायभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी यासाठी आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांत आठ केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांना मागणीचे निवेदन देत चर्चा केली. Rohit Pawar meets BJP ministers at the Center to imitate their work

आमदार रोहित पवार यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी अहमदनगर जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार पवार यांनी या दौऱ्यात अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना बरोबर घेतलेले नव्हते. याबाबत राजकीय कयास लावले जात आहेत. 

हेही वाचा...

या पार्श्वभूमी भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांना कोणीही भेटू शकते. आमदार रोहित पवार यांना भाजपच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे कामकाज आवडते आहे. त्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्षातील केंद्राचे मंत्री चांगले काम करतात. त्या विपरित महाराष्ट्रामधील मंत्री भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. त्यामुळे केंद्रातील मंत्र्यांची कामाची पद्धत आणि स्वच्छ कार्यपद्धती त्यांना आवडत असेल, त्यामुळे त्यांची नक्कल अथवा ते किती चांगले काम करतात याची माहिती घेण्यासाठी ते केंद्रीय मंत्र्यांना भेटत असतील.

आमदार रोहित पवार हे केंद्रातील मंत्र्यांना भेटून मतदार संघाचा विकास करायचा म्हणत असतील तर त्यांनी आत्तापर्यंत मागील दोन वर्षांत विकासकामांच्या भूमिपूजनाचे जे नारळ फोडले आहेत, ती सर्व विकासकामे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंजूर केलेल्या विकास निधीतीलच आहेत. त्यांनी मतदार संघात वेगळे काही केलेले नाही. त्यामुळे ते केंद्रीय मंत्र्यांना भेटून मतदार संघाचा विकास काही करणार नाहीत.

हेही वाचा...

मतदार संघाच्या विकासासाठी काही ते केंद्रीय मंत्र्यांना भेटणार नाहीत. केंद्रात भाजपचे काम चांगले आहे. त्याचे अनुकरण करण्यासाठी ते त्यांना जाऊन भेटतात. एखाद्या वेळी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा त्यांना विट आला असेल. इथे त्यांना पालकमंत्री भेटत नसल्यामुळे ते केंद्रातील मंत्र्यांना भेटतात, अशी टीकाही अरूण मुंडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com