मुंबई जिल्हा बॅंकेच्या चौकशीत राजकारण नाही : बाळासाहेब पाटील (व्हिडिओ)

: मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेबाबत काही तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार त्या तक्रारींची चौकशी होत आहे. बॅंकेचा अध्यक्ष कोण आहे, हे न पाहता त्या बॅंकेच्या कामकाजाची चौकशी होते. त्यामुळे त्यात राजकारण नाही, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली.
Balasaheb Patil
Balasaheb Patil

कऱ्हाड : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेबाबत काही तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार त्या तक्रारींची चौकशी होत आहे. बॅंकेचा अध्यक्ष कोण आहे, हे न पाहता त्या बॅंकेच्या कामकाजाची चौकशी होते. त्यामुळे त्यात राजकारण नाही, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली.

मुंबई जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आहेत, म्हणून त्या बॅंकेची चौकशी लागली आहे, असा आरोप होतो आहे, या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले, "असा कोणताही प्रकार नाही. वास्तविक मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या तक्रारी सहकार विभागाकडे आल्या आहेत. त्या अनुषंगाने त्याची चौकशी सुरू आहे. त्या बॅंकेचा अध्यक्ष कोण आहे, यापेक्षा त्या बॅंकेचा कारभार योग्य आहे का, याची चौकशी होत आहे. त्यात कोणतेही राजकारण असण्याची शक्‍यता नाही. काही तक्रारी गंभीर आहेत. त्यांची त्याप्रमाणे चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याबाबत काहीही बोलणे योग्य होणार नाही.''

ऊसदर आंदोलनाबाबत श्री. पाटील म्हणाले, "दर वर्षी कारखाने सुरू झाले, की अशी आंदोलने होत असतात. तशा प्रकारचे आंदोलन असू शकेल. मात्र, या वर्षी राज्यात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो ऊस तोडण्याचे मोठे आव्हान कारखाना व राज्यासमोर आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल ३२ कारखान्यांना ५३१ कोटींची थक हमी दिली आहे. त्यात राज्याची भूमिका सकारात्मक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचना आहेत. ऊस शिल्लक राहता कामा नये, अशा सूचनाही आहेत. त्यादृष्टीने राज्याने नियोजन केले आहे. कारखानेही सुरू होणार आहेत. ज्या कारखान्यांनी गाळप परवाने घेतलेले नाहीत. त्या सगळ्याच कारखान्यांवर कायदेशीर नियमानुसार कारवाई नक्की होईल. कायदाप्रमाणे ऊस तोडीनंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.''

सहकारी निवडणुका लवकर नाहीच

सहकारी संस्थांच्या निवडणुकाबाबत मंत्री पाटील म्हणाले, "मुळामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत. त्यात ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारला असे अपेक्षित होते, की कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत निवडणुका घेता येतील. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिल्ली किंवा राज्यातील स्थिती गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या सगळ्याच निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशीच स्थिती आहे.''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com