कोल्हापूरच्या या चार आमदारांनी चंद्रकांतदादांना दिला हा सल्ला.. पण दादा ऐकणार का?

राज्यावर संकट असतानाही भाजपाला राजकारणाशिवाय काही सूचत नाही. भाजपाने वारंवार राज्यपालांना सरकारविरोधात निवेदन देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्याला केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार आबिटकर यांनी चंद्रकांतदादांना केले.
chandrakantdada-satej patil
chandrakantdada-satej patil

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनावर टीका केली. याचे पडसाद गुरुवारी उमटले. कॉंग्रेस, शिवसेना आमदारांनी चंद्रकांतदादांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला. कोरोनाच्या संकटात राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. असे असताना चंद्रकांतदादा नुसतीच टीका करत आहेत. त्यांनी चांगल्या कामाला दाद देण्याची  दानत ठेवावी, असे आवाहन जिल्ह्यातील आमदारांनी केले.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, कोरोनाच्या भीषण संकटात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार जीवावर उदार होऊन, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, काम करीत आहेत. परंतू चंद्रकांतदादा पाटील व नेते मात्र नुसतीच टीका करून राजकारण करीत आहेत. चांगल्या कामाला चांगले म्हणायची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे आणि अशा कठीण प्रसंगात तरी राजकारण करू नये असा सल्ला आमदार प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, राज्यावर संकट असतानाही भाजपाला राजकारणाशिवाय काही सूचत नाही. भाजपाने वारंवार राज्यपालांना सरकारविरोधात निवेदन देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्याला केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार आबिटकर यांनी चंद्रकांतदादांना केले.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, चंद्रकांतदादांनी मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना या सर्व परिस्थिती कशा पध्दतीने काम करायचे याची कल्पना आहे. तरीही ते टीका करत आहेत, हे योग्य नाही. जिल्ह्यात कम्युनिटी संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. हे सर्व नियोजन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांनी चांगल्या कामाची दखल घेणे आवश्‍यक होते. मात्र तसे केले नाही.उलट त्यांनी टीकाच केली आहे. महापुरात कोणी काय काम केले आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे दादांसारख्या अनुभवी नेत्याने कोरोनाच्या कामात काही त्रुटी असतील तर दाखवून द्याव्यात मात्र राजकीय टीका टिप्पणी करु नये,असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा मोठ्या हिंमतीचे जिल्हा प्रशासन सामना करत आहे. त्यामुळे त्याचे चंद्रकांतदादांनी राजकारण करु नये. दादा हे राज्याचे नेते आहेत. ते अनुभवी आहेत. त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळातील महत्वाची खाती सांभाळली आहेत. ते राज्यात फिरत असतात. त्यामुळे कोरोनाच्या कामात काही त्रुटी असतील तर त्यांनी जरुर सांगाव्यात, मात्र राजकारण करु नये, ही राजकारणाची वेळ नसून संकटाशी एकसंघ लढण्याची वेळ असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

आमदार आवळेंकडून चंद्रकांतदादांचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत केलेल्या वक्‍तव्याचा आमदार राजूबाबा आवळे यांनी निषेध केला. पालकमंत्री पाटील हे ना. मुश्रीफ व ना. यड्रावकर यांच्यात समन्वय ठेवून काम करत आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेवून ते उपाययोजना राबवत आहेत. विविध विकास कामांसाठी त्यांनी भरघोस निधी दिला आहे. जिल्ह्यात अडकलेल्या हजारो परप्रांतीयांना त्यांच्या घरी सुखरू प पाठवले आहे. महाविकास आघाडीचे नेते एकदिलाने काम करत असल्यानेच अस्वस्थेतून चंद्रकांतदादा टीका करत असल्याचे पत्रक आमदार आवळे यांनी प्रसिद्धिस दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com