विधान परिषदेसाठी सांगलीतून सदाशिवराव पाटील यांची चर्चा 

राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांची निवड करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगली जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगली जिल्ह्यातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
Discussion of Sadashivrao Patil from Sangli for the Legislative Council
Discussion of Sadashivrao Patil from Sangli for the Legislative Council

पुणे : राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांची निवड करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगली जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगली जिल्ह्यातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पाटील यांचे समर्थक सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा घडवून आणत आहेत. पण, स्वतः पाटील मात्र कोरोनाच्या विरोधातील मोहिमेत योगदान देताना दिसत आहेत. 

सदाशिवराव पाटील यांनी 2004 आणि 2009 असे सलग दोन वेळा खानापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सन 2004 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यांना 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. पण, 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या अनिल बाबर यांनी पराभव केला. त्यानंतर 2019 मध्येही सदाशिव पाटील यांचा पराभव करत बाबर यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला. 

विधानसभा निवडणुकीनंतर सदाशिवराव पाटील यांनी सांगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे वडील माजी आमदार हणमंतराव पाटील हे शरद पवार यांच्यासोबत समाजवादी कॉंग्रेसमध्ये होते. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात त्या आठवणींना उजाळा मिळाला होता. 

पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चांगली संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते. त्यांचे कार्यकर्ते तसे सांगत आहेत. पण, अद्याप तरी तशी संधी मिळालेली नाही. ती संधी आगामी विधान परिषद सदस्यांच्या नेमणुका होताना मिळेल, असे सांगण्यात येत आहे. त्यांचे कार्यकर्ते तसा विश्वास व्यक्त करत आहेत. पण, पाटील मात्र सध्या कोरोनाच्या विरोधातील मोहीमेत सहभागी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून ते कोरोनाच्या काळात काम करताना दिसत आहेत. 
 

राज्यपाल नामनियुक्तीसाठी मोर्चेबांधणी सुरू 

मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त आठ सदस्यांची मुदत शनिवारी (ता. 6) संपत आहे; तर अन्य दोन सदस्यांची मुदत 15 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्तीसाठी आघाडीत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

जून 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी 12 सदस्यांची विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लावली होती. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा, कॉंग्रेसच्या पाच आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका सदस्याचा समावेश होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून राज्यपाल नामनियुक्त दोन जागा रिक्त आहेत. 

त्यामुळे आता उर्वरित आठ सदस्य 6 जून रोजी विधान परिषदेचा निरोप घेतील, तर अन्य दोन सदस्य 15 जूनला निवृत्त होतील. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांत राज्यपाल नामनियुक्त 12 जागांचे वाटप प्रत्येकी चार जागा असे होण्याची शक्‍यता आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने एकच जागा लढवली होती. त्यामुळे राज्यपाल नामनियुक्तीत कॉंग्रेसला अतिरिक्त जागा मिळू शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com