खडसे सेनेत आले काय किंवा राष्ट्रवादीत, दोन्ही सारखेच : अब्दुल सत्तार

अब्दुलसत्तार यांनी आज जालना तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ,अंतरवाला, भागांत जाऊन कपाशी आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
Abdul Sattar - Ekanath Khadse
Abdul Sattar - Ekanath Khadse

जालना : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले काय आणि शिवसेनेत आले काय, एकसारखेच आहे. महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक पहिलवान तयार असून ज्यांना महाविकास आघाडीतील ज्या पक्षात जायचे आहे तिथे त्यांनी जावे, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खडे यांना उद्देशून केले.

सत्तार यांनी आज जालना तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ,अंतरवाला, भागांत जाऊन कपाशी आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी (ता.22) निश्चित झाला असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झाले होते. पण "मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही," असे एकनाथ खडसे यांनी काल स्पष्ट केले.

मात्र, खडसे भाजपमध्ये नाराज आहेत हे सत्य अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे ते पक्षांतराचा विचार करत असल्याची चर्चा आहे. खडसे शिवसेनेत जाणार अशीही एक चर्चा होती. त्याबाबत अब्दुल सत्तार यांनी खडसे यांना वरीलप्रमाणे आवाहन केले. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही अशी टीका केली होती या टिकेचाही त्यांनी समाचार घेतला. दानवे हे मुख्यमंत्र्यांवरच काय पंतप्रधानांवर देखील टीका करतात अशी कोपरखळी त्यांनी मारली. बाळासाहेबांचे वारस असल्याचे सिदध करा, अन्यथा खुर्ची सोडा अशी टीका विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. या टिकेचाही सत्तार यांनी समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी सक्षमपणे सरकार चालवले हाच बाळासाहेबांचा वारसा आहे, असे सत्तार म्हणाले.

दरम्यान, पूरस्थितीमुळे राज्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तेथील महसुली वसुली थांबवणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई कोणत्याही परिस्थितीत मिळणार असून वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन देखील सत्तार यांनी दिले.  

विरोधक ज्या ताकदीने राज्य सरकारवर टीका करत आहेत तेवढीच ताकद त्यांनी केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी वापरावी असा टोलाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला. विरोधकांनी राज्याची आर्थिक परिस्थिती खराब करून ठेवल्यानेच ही परिस्थिती सुधारण्यासाठी मंत्री दौरे करत असून विरोधकांनी केंद्रात वजन वापरून महाराष्ट्राला मदत करायला हवी. तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी विरोधकांचाही सिंहाचा वाटा हवा, असा टोलाही सत्तार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com