..'त्या' प्रकरणात पोलिस अटकेत, मग आव्हाड बाहेर का? - निरंजन डावखरेंचा सवाल

५ एप्रिल रोजी ऐन लॉकडाऊन काळात ठाण्यात मध्यरात्री सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून उचलून नेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिन पोलिस शिपायांचा सहभाग होता असे सोसायटी सीसीटिव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले होते. कोरोना काळातही हे प्रकरण राजकीय दृष्ट्या चांगलेच गाजले
Niranjan Davkhare Targets Jitendra Awhad
Niranjan Davkhare Targets Jitendra Awhad

पुणे : पाच महिन्यांपूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात तीन पोलिस कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. वर्तकनगर (ठाणे) पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.बी.गायकवाड यांनी ही कारवाई केली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड कधी जाणार असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाचे ठाणे जिल्हाप्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी थेटपणे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांवरच निशाणा साधला आहे.

५ एप्रिल रोजी ऐन लॉकडाऊन काळात ठाण्यात मध्यरात्री सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून उचलून नेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिन पोलिस शिपायांचा सहभाग होता असे सोसायटी सीसीटिव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले होते. कोरोना काळातही हे प्रकरण राजकीय दृष्ट्या चांगलेच गाजले आणि राज्यभर त्याची चर्चाही झाली होती. महाआघाडीतील एका मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांकडूनच असे कृत्य झाल्याने संपूर्ण सरकारच्या प्रतिमेबद्दलही उलटसुलट बोलले गेले. 

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस नेमकी काय भूमिका घेणार याकडे भाजपासह संपूर्ण ठाणे व मुंबईकरांचे लक्ष होते. याबाबत वर्तकनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.बी.गायकवाड यांनी ठोस भूमिका घेत सागर मोरे, वैभव कदम व सुरेश जनाटे या तिन पोलिस कर्मचा-यांवर कारवाई करीत तिघांवर अटक कारवाई केली.

दरम्यान या कारवाईचे स्वागत करमुसे यांच्या लढ्यात पहिल्यापासून पाठीशी उभे राहिलेले आमदार निरंजन डावखरे यांनी करत महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन केले. मात्र वरील तिनही पोलिस शिपाई आणि करमुसे यांचे काहीही वाद वा वैर नव्हते व नाही. मात्र या तिघांना करमुसेंना मारहाण करायला लावलेले सूत्रधार अद्याप बाहेर कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अर्थात हे सुत्रधार म्हणजेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेच असल्याचा आरोप केला जात असल्याने अ‍ॅड.डावखरे यांचा निशाणा थेट आव्हाडांवर असल्याने महाराष्ट्र पोलिस या प्रकरणातील कारवाईचे पुढील पाऊल काय टाकतात याची उत्सुकता आहे. 

या प्रकरणात खरे तर भाजपा आणि महाआघाडी असाच राजकीय सामना रंगला आहे. पर्यायाने तक्रारदारांच्या पाठीशी ठाम उभे राहून करमुसेंच्या लढाईला मदत करणारे ठाणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.निरंजन डावखरे आणि समोर राष्ट्रवादीचे आणि पर्यायाने महाआघाडीच्या सरकारमधील ताकदवान मंत्री जितेंद्र आव्हाड असे हे चित्र सध्या उभे आहे. मात्र, या राजकीय लढाईत आव्हाड-डावखरे यातील कोण-कुणावर वरचढ होणार याची उत्सुकता ठाणेकरांबरोबर तमाम मुंबईकर व महाराष्ट्राला येत्या काळात राहणार हे नक्की. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com