महापालिकेच्या कारभारावर सुळे नाराज ; प्रशासनाला जाग केव्हा येणार..?

कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
4Maha_COVID_19_quarantined_S.jpg
4Maha_COVID_19_quarantined_S.jpg

पुणे : मुसळधार पावसामुळे कालपासून पुण्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पूरस्थितीचा आढावा घेऊन आज पाहणी केली. कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

कात्रज नाल्याच्या भोवतीच्या संरक्षक भिंती दोन वर्षापूर्वी पुरामध्ये वाहून गेल्यानंतर अजूनही या भिंती बांधण्यात आलेल्या नाही. शहरात गेल्या वर्षीही असाच पाऊस होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. पण एक वर्ष होऊनही कोणतीही सुधारणा झाली नाही. यंदाच्या पावसात देखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. 

प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर सुळे म्हणाल्या, "पुणे महानगरपालिकेच्या गैरकारभारावर बोट ठेवत अनेक सुधारणा करण्यासाठी आमच्या नगरसेवकाना सोबत घेऊन पालकमंत्र्यांबरोबर उद्या (शुक्रवारी) बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत अनेक उपाय योजनांवर मार्ग निघेल आणि यापुढील काळात यावर सुधारणा होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
वारंवार स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही पुणे महापालिकेकडून निधी दिला जात नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पुणे महापालिका काही करत नसल्यामुळे आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे या संदर्भामध्ये दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अतिसृष्टीमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. अनेक घराचे नुकसान झाले आहे, तर मोठ्या प्रमाणावर सोसायट्यामध्ये पाणी साचले आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत केलेल्या उपाय योजनांवरून पुणे महापालिका आणि सत्ताधारी यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  


हेही वाचा :'जलयुक्त'मध्ये पाणी मुरले की पैसे हे स्पष्ट होईल...
 
मुंबई :जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली होती. आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी टि्वट केलं होतं. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल. ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com