पुणे : भारतीय पुरातत्व विभाग हा महाराष्ट्रद्रोही असून, शिवनेरी आणि रायगड किल्ल्यांची देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. हा आदेश तातडीने रद्द करावा; अन्यथा आमच्याशी गाठ असल्याचा शिवसेना स्टाईल इशारा शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबतचे ट्विट करत भारतीय पुरातत्व विभागाकडे ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
ट्विटमध्ये आढळराव यांनी म्हटले आहे की, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी आणि समाधिस्थळ किल्ले रायगड येथील देखभालीसाठी असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचे दुष्कृत्य पुरातत्व विभागाच्या मुंबई कार्यालयाने केले आहे.
हे कर्मचारी बेरोजगार होणार असून किल्ल्याच्या देखभालीसह सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होणार आहे. मुंबई विभागाचे डॉ. यादव हे महाराष्ट्र द्रोही असून, त्यांनी तातडीने हा आदेश मागे घ्यावा; अन्यथा आमच्याशी (शिवसेनेशी) गाठ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवनेरी आणि रायगड किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तातडीने लक्ष घालण्याची विनंतीही आढळराव यांनी केली आहे.
दरम्यान, पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉ. राजेंद्र यादव यांनी 2020-21 या वर्षासाठीच्या खर्चाला मंजुरी नसल्याचे कारण देत, शिवनेरी आणि रायगड किल्ल्यासाठीच्या कर्मचारी कपात करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाबाबत आपण केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना पत्र देऊन आदेश रद्द करण्याबाबत बोलणार असल्याचे माजी खासदार आढळराव यांनी "सरकारनामा'ला सांगितले.
हेही वाचा : मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचे पंतप्रधानांचे संकेत
नवी दिल्ली : माता मृत्यूदर रोखण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून दिले. याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येताच मुलीच्या लग्नाच्या वयाबाबतचा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मोदी यांनी सांगितले.
लाल किल्ल्यावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे देशाला उद्देशून भाषण झाले. त्यात त्यांनी अनेक घोषणा केल्या. त्यावेळीच त्यांनी मुलीच्या लग्नाच्या वयासंदर्भातही सूतोवाच केले.
देशात सध्या मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे इतके आहे. पण, अठरा वर्षांपर्यंत मुलीची शारीरिक वाढही झालेली नसते. तसेच, तिच्या शैक्षणिक वाटचालीत खंड पडतो. त्यामुळे अठरा वर्षांपर्यंत तिचे ना शिक्षण पूर्ण होते ना तिची शारीरिक वाढ होते, त्यामुळे मुलीच्या लग्नाच्या वयात वाढ होण्याची गरज या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून बोलून दाखवली जात होती.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.