तुम्ही व्यापाऱ्यांना फटकवा; मी त्यांचे लायसन्स रद्द करतो 

त्या व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द केले जाईल.
Sanjay Kale, Chairman, Junnar Market Committee, warns traders against lowering tomato prices
Sanjay Kale, Chairman, Junnar Market Committee, warns traders against lowering tomato prices

पुणे  ः उत्तर भारताला उन्हाळी हंगामात सर्वाधिक टोमॅटो पुरवठा करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव उपबाजार समितीमध्ये आज (ता. १८ जून) टोमॅटोचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी पाडल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आंदोलनात थेट जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनीच आंदोलनात सहभाग घेत तुम्ही व्यापाऱ्यांना फटकवा. मी व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करतो, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिला. दरम्यानच्या काळात नारायणराव उपबाजार समितीत मोठा गोंधळ पहायला मिळाला. (Sanjay Kale, Chairman, Junnar Market Committee, warns traders against lowering tomato prices)
 
शेतकरी आज सकाळी जेव्हा टोमॅटो घेऊन विक्रीसाठी नारायणगाव उपबाजार समितीत आले, तेव्हा 20 किलोच्या क्रेटला एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये प्रतिक्रेट बाजारभाव होता. परंतु व्यापाऱ्यांनी संगनमत करून हा बाजारभाव क्रेटसाठी वीस ते तीस रुपये केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी सभापती संजय काळे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केल्यास त्या व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द केले जाईल, असेही सभापती काळे यांनी या वेळी स्पष्ट केले. 

व्यापारी जर शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असतील, तर अशा व्यापाऱ्यांना फटकावा, असेही सभापती काळे हे आवेशात बोलून गेले. विशेष म्हणजे एकदा, दोनदा नाही तर तब्बल तीन वेळा ते तावातावाने असेच बोलले. त्याला शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. या वेळी संजय काळे यांनी सर्व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले की आजपासून सर्व कर्मचारी बाजार समितीमध्ये तैनात राहतील. जर व्यापाऱ्यांनी भाव पाडले आणि शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, तर व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करू, असा इशारा दिला. या सर्व परिस्थितीत काही काळ बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यावेळी बाजार समिती कारवाई का करत नाही?

उत्तर भारतामध्ये सर्वाधिक टोमॅटो नारायणगाव मार्केटमधून निर्यात होतात, त्यासाठी उत्तर प्रदेश, दिल्ली या परिसरातून दरवर्षी पाचशे ते हजार व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी येत असतात. मात्र, बाजार समितीच्या सभापतीनेच जर शेतकऱ्यांना चिथावणी दिली, तर व्यापारी तिकडे काणाडोळा करतील आणि पर्यायाने त्याचा परिणाम शेतकऱ्यांनाच भोगावा लागेल. या ठिकाणी खरेदी होणारा टोमॅटो बाहेरील व्यापाऱ्यांनी खरेदी केला नाही, तर पर्यायाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या सभापतीने असे चिथावणीखोर वक्तव्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे? दरम्यान, व्यापारी सातत्याने बाजारभाव पाडतात, त्यावेळेस बाजार समिती कारवाई का करत नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com