1498 ला बारामतीच्या तरडोलीत झाली होती लढाई; 14 सगर लढवय्यांनी दाखवले होते क्षात्रतेज

महाराष्ट्रातील विदर्भ, सातारा, कोल्हापूर, कोकण, पुणे या जिल्ह्यांमध्ये शेगर (मराठी सगर) समाज मोठ्या संख्येने आढळतो.
 sagar community warriors history comes out regarding tardoli fight
sagar community warriors history comes out regarding tardoli fight

सोमेश्वरनगर (बारामती) : महाराष्ट्रातील सगर (शेगर) समाजाचा क्षात्रतेजाने उजळून निघालेला इतिहास आता आढळून आला आहे. इ. स. १४९८ मध्ये बारामती तालुक्यातील तरडोली येथे सोळा गावांवरचे आक्रमण मोडून काढताना वायुवेगाने लढलेल्या चौदा सगर समजाचा गौरव करणारी चौपाई आढळली आहे. तसेच त्याही आधीच्या काळात गुजराथमधील पाटण, कच्छ आदी ठिकाणी कित्येक सगर योध्दे वीरगतीस प्राप्त झाल्याची माहिती देणारी चौपाईदेखील आढळली आहे. 

महाराष्ट्रातील विदर्भ, सातारा, कोल्हापूर, कोकण, पुणे या जिल्ह्यांमध्ये शेगर (मराठी सगर) समाज मोठ्या संख्येने आढळतो. नीरा-भीमा नदीकाठी वसलेला हा समाज शेतकरी आहे. या समाजातील तरूणांनी क्षत्रिय सगर रजपूत सेवा संघ या संघटनेमार्फत आपल्या इतिहासाचा धांडोळा घेण्यास मागील काही वर्षापासून सुरवात केली होती. हा शोध घेताना समशेरबहाद्दर संताजी आटोळे, सरलष्कर जनकोजी कोकणे, सेट्याजी खोमणे या शिवकालीन अपरिचित योद्ध्यांचा इतिहास आढळला. मात्र आता त्याच्याही आधीचा इतिहास त्यांना सापडला आहे. 

गुजराथमधील अर्कालॅाजिकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये जुन्या काळात लिहल्या गेलेल्या चौपाई आढळल्या आहेत. कऱ्हा नदीकाठी असलेल्या सोळा गावांवर अहमदनगर सल्तनतीच्या हाजी मरवान व कासिम याह्या या योध्द्यांनी १४९८ मध्ये आक्रमण केले होते. त्या युध्दाचे वर्णन करणारी चौपाई ब्राम्हण कवी रायजी सयाजी पिंगळे यांनी लिहली. त्यातील नऊ उतारे सापडले आहेत. त्यामध्ये पठाण, कासिम यांच्याशी आटोळे, गावडे, खोमणे, सोरटे, वायाळ, गाढवे, सांगळे, शिंगाडे, ताम्हाणे, धुमाळ, धायतोंडे, पोमणे, राऊत, सगर असे चौदा योध्दे झुंजले होते अशी स्पष्ट नोंद मिळाली आहे. पिंगळे, राऊत यांचेही सहाय्य झाले. चौदा सगरक्षात्र वायुवेगाने लढले असेही नमूद आहे. सांगवी, भिलारवाडी या गावांतील योध्दे होते असाही उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे तेव्हाचा सुपे परगणा आणि आजचा बारामती तालुका याला पराक्रमाचा प्राचीन इतिहास असल्याचे प्रथमच पुढे येऊ शकतो.

याशिवाय एक हजार वर्षापूर्वी पाटण येथे लढलेल्या युध्दाचेही संस्कृत भाषेत वर्णन असणारी चौपाई सापडली आहे. यामध्ये सगर कुळाचा इश्वाकू वंशापासून सगर राजापर्यंतचा इतिहास लिहला आहे. त्याला जोडून कच्छ, पाटण येथे झालेल्या युध्दाचा संदर्भ दिला आहे. महायुध्दात सोळा सगर लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाल्याचाही उल्लेख आहे. भीलवाडचे ददाजी, गंगापूरचे रेण, हालाजीचे सगर मराठा, रेवाकाठचे गावडे, रोहिशाळाचे कर्णदेव, धुळ्याचे खोमणे, अमरावतीचे अजाण, जळगावचे शिंगाणे, कोल्हापूरचे आटोळे, साताऱ्याचे ताम्हाणे, इडरे, सोरटे अशा महाराष्ट्रातील मराठी सगर क्षत्रियांचा उल्लेख चौपाईत आहे. ही चौपाई राजकवी इश्वरा बोक्षा याने लिहलेली आहे. या चौपाईमुळे आज शेती करणारा आणि काही ठिकाणी मेंढ्या पाळणारा समाज लढवय्या होता हे समोर येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, आपली ओळख शोधत आम्ही पुणे, गुजराथ येथील पुराभिलेख खात्यासह ब्रिटीश लायब्ररीचाही धांडोळा घेतला आहे. परकीय आक्रमण अंगावर झेलून प्रतिरोध करणारा हा समाज होता असा अपरिचित इतिहास पुढे येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com