मोहन जोशी म्हणतात, 'नोटाबंदीची आज चौथी पुण्यतिथी' 

उलट गेली चार वर्षे या निर्णयाचे दुष्परिणामच देशाला भोगावे लागले आहेत.
 Mohan Joshi criticizes denomination decision
Mohan Joshi criticizes denomination decision

पुणे : "सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारा नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला, त्याची आज (ता. 8 नोव्हेंबर) चौथी पुण्यतिथी आहे,' अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. 

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आजचा दिवस (ता. 8 नोव्हेंबर) हा विश्वासघात दिन म्हणून पाळला जात आहे, असे सांगून मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नोटबंदी लागू केल्यामुळे काळा पैसा बाहेर काढला जाईल, भ्रष्टाचार संपेल, अर्थपुरवठा रोखला गेल्याने दहशतवाद मोडून पडेल, असे दावे पंतप्रधान मोदी यांनी केले. परंतु, यातील काहीच घडले नाही.

उलट गेली चार वर्षे या निर्णयाचे दुष्परिणामच देशाला भोगावे लागले आहेत. अनेक उद्योग बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाची आर्थिक घसरण होत गेली. अनेक अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या निर्णयापासून दूर झाले, त्यातून देशाचीच हानी झाली. 

सध्या तर अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणा केल्या. मात्र, सामान्य माणसांसाठी त्या कुचकामी ठरल्या आहेत. सध्या सणावाराचे दिवस असूनही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

कोरोना महामारीच्या साथीमुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला, हा दावा पूर्णपणे मान्य होणारा नाही. नोटबंदीपासूनच अर्थव्यवस्था ढासळत आली आहे, ती आत्ताच्या काळात पूर्णपणे कोलमडली, असे मोहन जोशी यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com