पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यापासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यातील ठिकठिकाणचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र
सर्व समन्वयकांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ही फोन टॅपिंग त्वरित थांबवा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्व जण एकमेकांशी मोबाईलद्वारे चर्चा करत असतात. परंतु मागील आठवडाभरापासून सर्व समन्वयकांच्या
मोबाईलमध्ये बोलताना वेगळ्या पद्धतीचे आवाज येऊ लागले आहेत. याबाबत तांत्रिक माहिती घेतली असता, फोन टॅप होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
समाजाचे सर्व नेते राज्य सरकारला प्रथमपासून सहकार्य करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणांनी असे फोन टॅप करू नयेत, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. या फोन टॅपिंगची माहिती गृहमंत्री
अनिल देशमुख यांना दिली जाणार आहे. पूर्वीही असा प्रकार झाला होता, असेही कोंढरे यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.