Maharashtra Congress slams Devendra Fadanvis over OBC Reservation
Maharashtra Congress slams Devendra Fadanvis over OBC Reservation

मंत्रीमंडळाच्या 240 बैठका झाल्या, मग आरक्षणाचा निर्णय का नाही घेतला?

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सरकारला आव्हान दिलं. तुम्हाला आरक्षण द्यायला जमत नसेल तर आम्हाला सत्ता द्या, चार महिन्यांत आरक्षण देतो, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. काँग्रेसने या वक्तव्यावरून फडणवीसांवर पलटवार केला आहे. (Maharashtra Congress slams Devendra Fadanvis over OBC Reservation)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील सत्ता हातची गेल्यानंतर भाजपचे फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावरून राजकीय संन्यासाची भाषा आठवू लागली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सत्तेवर आलो तर, मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेईन, असे विधान फडणवीस यांनी केले होते, याची आठवण जोशी यांनी करून दिली.

2014 साली फडणवीस राज्यात सत्तेवर आले. त्यानंतर पाच वर्षे तेच मुख्यमंत्री होते. त्या काळात मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत तर नाहीच, त्यानंतर मंत्रीमंडळाच्या २४० बैठका झाल्या. पण, फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या आश्वासनावर आणि राजकीय संन्यास घेण्याच्या भाषेवर विश्वास किती ठेवायचा? सत्ता हातून गेल्याने त्यांना आता पुन्हा आश्वासने देण्याची वेळ आली असून, संन्यास घेण्याची भाषा करावी लागत आहे. परंतु, ओबीसी जनता फडणवीस यांच्या अशा विधानांना भुलणार नाही, अशी टीका जोशी यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने 2010 साली ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि महिला आरक्षण वैध ठरविले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी ओबीसी जनतेची आकडेवारी मागितली होती. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांनी ती दिली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एक अध्यादेश काढून फडणवीस यांनी एस.सी., एस.टी.सह ओबीसींना आरक्षण देऊ केले. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावे असे म्हटले पण, अंमलबजावणी करण्यासाठी लोकसंख्येचे प्रमाण किती हे ते ठरवू शकले नाहीत, असे जोशी यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने त्यांना आकडेवारी दिली नाही म्हणून ओबीसी आरक्षणाला मुकले, याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसच आहेत. आता मात्र वेगवेगळी विधाने करून फडणवीस लोकांची दिशाभूल करत सुटले आहेत, अशी टीका जोशी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com