सारथी: सीताराम कुंटे यांनी अहवाल दिला तरच डी. आर. परिहारांवर कारवाई होणार!

आज पुण्यात आलेल्या वडेट्टीवारांनी सारथी कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे ठासून सांगितले
Maharashtra cabinet minister vijay vadettiwar on sarthi
Maharashtra cabinet minister vijay vadettiwar on sarthi

पुणे: सारथी संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले. तसेच माजी व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांची चौकशी सीताराम कुंटे हे वरिष्ठ सनदी अधिकारी करत आहेत. त्यांच्या अहवालावरच कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सारथी बंद पाडण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून सुरू असल्याचा मराठा संघटनांचा आरोप आहे. त्यासंबंधाने मराठा नेते आक्रमक आहेत. मराठी क्रांती मोर्चाने तर वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यासंदर्भाने आज पुण्यात आलेल्या वडेट्टीवारांनी सारथी कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे ठासून सांगितले. या संस्थेच्या माध्ममातून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली शिष्यवृत्ती मागेपुढे होवू शकते, मात्र ती नक्की मिळणार असेही त्यांनी नमूद केले.  

माजी व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांच्यासंदर्भात परिहार म्हणाले, परिहार यांनी खर्च करताना शासनाची मंजुरी घेतली नाही. "मी करेन तेच योग्य' ही त्यांची भूमिका होती. त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली, त्या समितीने परिहार यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु काही मंत्र्यांनी या समितीबद्दल आक्षेप नोंदविला. त्यामुळे वरिष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांच्याकडे चौकशीचे कामकाज देण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

हरी नरके यांच्या लेखावरून वादंग

पुणे: पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी लिहलेल्या एका लेखात व्यसनाधिनता व महिला हिंसाचारासंदर्भात मांडलेल्या मुद्यांवर बौद्ध समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून सोशल मिडीयावर टीकाटिप्पण्णी सुरू होती. अखेर याप्रकणात दिलगिरी व्यक्त करून हरी नरके यांनी वादावर पडदा टाकला आहे.

हरी नरके यांनी २६ जुन २०२० रोजी शाहू जयंतीनिमित्त लेख लिहला होता. छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय? असे त्या लेखाचे शिर्षक होते. 'फुले-शाहू-आंबेडकर यांच्यात ४२ गोष्टींबाबत साम्य होते.त्यातली एक म्हणजे हे तिघेही निर्व्यसनी होते. संपुर्ण निर्व्यसनी' असा उल्लेख करून नरके यांनी दहाव्या मुद्यात व्यसनाधिनता आणि घरेलू हिंसाचारासंदर्भात काही मांडणी केली होती. त्या मांडणीला बौद्ध समाजातून आक्षेप घेण्यात आला होता. नरके यांच्यावर टीका टिप्पण्णी करण्यात येत होती. अनेकांनी नरके यांची मांडणी बरोबर असल्याचेही म्हटले होते. सोशल मिडीयावर हा वाद गाजत होता. त्यावर दिलगिरी व्यक्त करून नरके यांनी वादावर पडदा टाकला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com