पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर गृहमंत्री वळसे पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्त्व्य   

राठोड यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Dilip Walse Patil .jpg
Dilip Walse Patil .jpg

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chvan) आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तत्कालिन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी आता पूजाच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे (Pune Police) जबाब नोंदवला आहे. त्यानंतर राठोड यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६ जुलै) पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.  (Home Minister Dilip Walse Patil's reaction in Pooja Chavan's death case) 

वळसे पाटील म्हणाले की, ''पुणे पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. मी त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नाही. पोलिसांवर दबाव असण्याचे काही कारण नाही. पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. पोलिसांनी कोणाला अहवाल दिला. या संदर्भात मला माहिती नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर त्याबद्दल सांगता येईल. अहवाल येण्यापूर्वीच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन  उडी मारून तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून पुढील तपासात कोणताही प्रगती झालेली नव्हती. या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे उत्तर दिले जात होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. 

 
वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पूजाच्या आई-वडिलांना पुण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तसेच, पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचेही त्यांनी जबाबात स्पष्ट केले. पूजाचा आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपने या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. विशेषत: या प्रकरणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर सांगू नये, अशी तंबीही पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com