राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याबाबत अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या पाचजणांविरोधात तक्रार

लवांडे यांनी सुधीर कुलकर्णी, प्रसाद प्रकाशराव देशपांडे, प्रभाकर जळगावकर, विद्याधर भागवत व धर्मराज विवासवान यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
police
police

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा निषेध केला म्हणून राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांना फेसबूकवरून अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल पाच जणांच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून फेसबूकवर लिहिताना महात्मा गांधींबद्दल असे बोलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, अशी पोस्ट फेसबूकवर राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी लिहिली. त्याला उत्तर देताना या पाचजणांनी लवांडे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत त्यांना उत्तर दिले होते. या आधारे लवांडे यांनी सुधीर कुलकर्णी, प्रसाद प्रकाशराव देशपांडे, प्रभाकर जळगावकर, विद्याधर भागवत व धर्मराज विवासवान यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महात्मा गांधी व माझ्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह, विकृत आणि अश्‍लिल स्वरूपाचे लेखन केले आहे. लोकशाहीत मतभेद स्वाभाविक आहे. 

मात्र, त्यासाठी आपली भूमिका मांडताना लोकशाही मूल्यांचा आदर करून भाषा वापरली पाहिजे. वैयक्तिक शिवीगाळ, दमबाजी या गोष्टींना स्थान असू नये, चर्चेचे संवादाचे नियम सर्वांनी पाळायला हवेत माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात मी या सर्व गोष्टींचे पालन करतो. मात्र, अत्यंत वाईट शब्‍दात फेसबूकवर या पाचजणांनी लिहिल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांकडे जावे लागल्याचे लवांडे यांनी म्हटले आहे.

एका माध्यम समूहाच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख वध असा केला होता. त्यावरून समाज माध्यमात बराच गोंधळा उडाला. आरोप- प्रत्यारोप झाले. मात्र, हे होताना चर्चेची, आरोपाची पातळी घसरून वैयक्तिक टीका-टिपणी सुरू झाली. सुधीर कुलकर्णी व इतर चार जणांनी लवांडे यांना उद्देशून अत्यंत घाणेरडी भाषा वापरली. त्यातून फेसबूकवरच आरोप वाईट शब्दात बोलले गेल्याने लवांडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात तक्रार दिली.


ही बातमीपण वाचा : भाजप नेत्यांनी अगोदर हे आकडे पाहावेत!

मुंबई : भाजपशासित राज्यात तेथील सरकारांनी कोरोनासमोर लोटांगण घातले असून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गुजरात मॉडेलच्या चंद्राला पडलेली विवरे आधी पहावीत आणि नंतर महाराष्ट्र सरकारबद्दल बोलावे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांना दिला आहे. सावंत म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या तक्रारीची दखल घेत कोरोनावर सुनावणी घेऊन गुजरातमधील आरोग्य यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर आणला आहे. ज्या पद्धतीची विधाने उच्च न्यायालयाने केली त्यातून भाजप सरकारचा अकार्यक्षमपणा उघड झाला आहे.  अहमदाबादमधील कोरोना परिस्थितीवर सरकारच्या वतीने उत्तर देताना महाधिवक्त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक असून कोरोनाच्या चाचण्याच करत नसल्याचे सांगून चाचण्या केल्या तर एकट्या अहमदाबादमध्ये ७० टक्के कोरोना रुग्ण आढळतील असे म्हटले आहे. याचा अर्थ अहमदाबादची सध्याची संयुक्त महासंघाच्या अंदाजानुसार ७८ लाख लोकसंख्या गृहित धऱता किंवा २०११ च्या जनगणनेच्या आधारावर अहमदाबादची लोकसंख्या ५५.७ लक्ष आहे हे पाहता ७० टक्के रुग्ण म्हणजे कमाल ५५ लाख तर किमान ४० लाख कोरोना रुग्ण आहेत असे म्हणावे लागेल आणि निश्चितच हे आकडे दडवले जात आहेत. भाजपशासित राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती असून उत्तर प्रदेश, कर्नाटकची परिस्थीतीही याहून वेगळी नाही. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com