पुणे : राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामध्ये शाब्दीक वाद रंगला आहे. आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी या वादावर आज पुन्हा भाष्य केले.
पाटील म्हणाले की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाहीत. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणे भाग असल्याचे पाटील म्हणाले. ते भाजप बद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलले तर मी शांत बसणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.
सरकार पडले म्हणून अजित पवार यांच्यावर राग आहे का असा प्रश्ना पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की माझा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राग सरकार पडले म्हणून अजित पवारांवर नाही. आमचा राग शिवसेनेने दगा दिला, त्यामुळे शिवसेनेवर आहे, असे पाटील म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते?
हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,'' अशा शब्दात पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ''जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.