आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे : चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा

भाजपच्या विरोधात सत्ताधारी आघाडीचे तीन पक्ष एकत्र असूनही भाजपने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली.
BJP will strengthen its organization to win all elections on its own : Chandrakant Patil
BJP will strengthen its organization to win all elections on its own : Chandrakant Patil

पुणे : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता; तोपर्यंत दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी युतीच्या प्रश्नावर नामोल्लेख टाळत उत्तर दिले. (BJP will strengthen its organization to win all elections on its own : Chandrakant Patil)

चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पुणे शहरात ठिकठिकाणी सेवा कार्याचे आयोजन केले होते. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. 

वाढदिवसाचा संकल्प काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी तीन पक्ष एकत्र असले तरीही आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर जिंकेल इतके मजबूत पक्ष संघटन निर्माण करणे हा आपला संकल्प आहे. भाजप आज राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपच्या विरोधात सत्ताधारी आघाडीचे तीन पक्ष एकत्र असूनही भाजपने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. त्याच पद्धतीने साडेसहा हजार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला. पक्षाचे संघटन मजबूत आहे, ते आणखी मजबूत करणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार समाजातील वंचितांसाठी शक्य तेवढे काम करण्याचा आपला सामाजिक संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील वंचित घटकांतील १३२० जणांना खासगी रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठीची मोफत कुपन देण्यात आली. तसेच, मतदारसंघातील तीन हजार रिक्षाचालकांना सीएनजी इंधनासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची कुपन देण्यात येत आहेत. त्यापैकी अडीच हजार रिक्षाचालकांना गुरुवारी (ता. १० जून) वाटप करण्यात आले. मतदारसंघातील वीस हजार मुलींना शिलाईसह ड्रेसचे कापड देण्यात येणार आहे. कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या छोट्या व्यावसायिकांना दहा हजार ते पन्नास हजार रुपये कर्जाच्या स्वरुपात मदतही करण्यात येणार आहे.

 
मुंबईत बुधवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत गेली वीस वर्षे शिवसेनेची सत्ता आहे आणि गेली दीड वर्षे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प चाळीस हजार कोटी रुपयांचा आहे. तरीही लोकांचे शहरात हाल होत आहेत. आता तर मुंबईत असुरक्षित वाटू लागले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत लोक मुंबईत शिवसेनेला धडा शिकवतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com