सगळे पक्ष फिरून आलेल्या कल्याण काळेंनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये

तुमच्या पाय गुणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटतट पडले आहेत.
Kalyanrao Kale should not teach us party loyalty : Deepak Pawar
Kalyanrao Kale should not teach us party loyalty : Deepak Pawar

पंढरपूर : सगळ्या पक्षात हिंडून आलेल्या कल्याणराव काळे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा काय असते, हे शिकवू नये. काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  आल्यापासूनच पंढरपुरातील राष्ट्रवादीला घरघर लागली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी लगावला. (Kalyanrao Kale should not teach us party loyalty : Deepak Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी रविवारी (ता.12 सप्टेंबर) कासेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ‘आपल्याच पक्षाचे पदाधिकारी आमची मापं काढतात,’ अशी तक्रार वरिष्ठ नेत्यांसमोर केली होती. त्यावर आज पवार यांनी काळे यांच्या तक्रारीचा चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर निशाना साधला आहे. 

तुमच्या कारखान्याकडे थकीत असलेली उसाची बिलं द्या, तुमच्यावर कोणीही नजर ठेवणार नाही की कोणी तुमची मापं काढणार नाही. असे सांगत तुमच्या पाय गुणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटतट पडल्याचा आरोपही पवार यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे.

या वेळी दीपक पवार म्हणाले की, आमचे नेते शरद पवारांच्या विचारांवर चालणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षाच्या विचारांशी आम्ही आजही बांधील आहोत. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या पक्षात फिरून आलेल्या काळे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा आणि तत्वे शिकवण्याची गरज नाही. भालके-काळे या दोन्ही नेत्यांच्या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकली आहेत. थकीत उसाची बिलं मिळावीत म्हणून शेतकरी हेलपाटे मारुन थकले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे नेते पक्ष कार्यकर्त्यांना काय उपदेश करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ज्या संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्याच संस्थेवर आम्ही बोलणार. तुम्हाला विरोधकांच्या कारखान्याची बरोबरी करायची असेल तर त्यांच्या बरोबरीने ऊस दर द्या. चंद्रभागा कारखान्याने 25, तर विठ्ठल कारखान्याने शेतकऱ्यांचे  30 कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे भालके -काळे या दोन्ही नेत्यांवर शेतकऱ्यांची नजर आहे. तुम्हाला कारभारी व्हायचं असेल तर तुम्ही ज्या संस्थांचा कारभार करत आहात. त्या संस्थांचे  कोणी वाटुळे केले हे पण सांगा. तुम्ही पक्षात आयात झाल्यापासूनच स्वयंपाक बिघडल्याचे ही पवार यांनी सांगितले. विठ्ठल आणि चंद्रभागा साखर कारखान्याच्या सभासादांची तुम्ही फसवणूक केली आहे. याचाही शेतकरी आता तुम्हाला जाब विचारतील, असेही दीपक पवार यांनी कल्याण काळे यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com