मल्हार पाटलांकडून पार्थ यांची पुन्हा पाठराखण

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी सकाळी दिला आहे. त्यानंतर काही मिनिटांतच पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे. तेच ट्टिव रिट्विट करत पद्यसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे.
Malhar Patil again supported Parth Pawar
Malhar Patil again supported Parth Pawar

मुंबई  : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी सकाळी दिला आहे. त्यानंतर काही मिनिटांतच पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे. तेच ट्टिव रिट्विट करत पद्यसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीवरून पार्थ पवार यांना अपरिपक्व असे म्हणत जाहीररित्या फटकारले होते. त्या वेळी उठलेल्या वादळातही पार्थ यांचे आजोळ असलेल्या उस्मानाबादचे पद्यसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थची पाठराखण केली होती.

त्यावेळी त्यांनी ट्विट करत ‘आपण जन्मजात सैनिक आहात आणि हे मी लहानपणापासून पाहत आलो आहे. मला तुझा अभिमान आहे,’ अशा शब्दांत मल्हार यांनी पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला होता. 

त्यानंतर आठवड्याभरातच सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिला. त्यानंतर काही मिनिटांमध्येच पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ यांचे हेच ट्विट रिट्विट करत मल्हार यांनी पुन्हा एकदा पार्थ यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. या दोन्ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत होत्या. त्यानंतर आपण पार्थच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही, पार्थ अपरिपक्व आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. 

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही, असा सवाल भाजपचे नेते आमदार, अॅड. आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com