अब्दुल सत्तारांना डोक्यावरील टोपी काढण्याची वेळच येवू देणार नाही : दानवे

अब्दुल सत्तर यांचे पहिले वक्तव्य होत की, रावसाहेब दानवे पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही. आता म्हणतात की, टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली, तर माझंच काम करतात.
Abdul Sattar, Rabsaheb Danve
Abdul Sattar, Rabsaheb Danve

पुणे  : ‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही,’ असा निर्धार शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. सत्तार यांच्या या निर्धारावरून रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांना टोला लगावला आहे. "बिचारे बोलतात, पण निवडणूक आली की, माझंच काम करतात", असा चिमटा दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना काढला आहे.

भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणीचा मेळावा लोणावळ्यात पार पडला. या मेळाव्याला रावसाहेब दानवे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला.

दानवे म्हणाले,”अब्दुल सत्तर यांचे पहिले वक्तव्य होत की, रावसाहेब दानवे पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही. आता म्हणतात की, टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली, तर माझंच काम करतात. ते आमचे मित्र आहेत. त्यांची टोपी काढणार नाही. कधीच निघू देणार नाही! खरं तर केसच उगवू देणार नव्हतो,”असे दानवे म्हाणाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी हे सरकार कमी पडले

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “मराठा आरक्षणाचा विषय या सरकार ने क्लिष्ट करून टाकला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होत तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करायला हवी होती. त्यावेळी नारायण राणे समिती स्थापन केली. त्यांनी आरक्षण दिले. या सरकारला माहीत होते की मागासवर्गीय आयोग नेमल्या शिवाय आरक्षण देता येत नाही.

हे आरक्षण टिकत नाही, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आरक्षण दिले होत. ते त्यांना टिकवता आला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आरक्षण दिले आणि ते टिकवले. आता हे टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. आमचे स्पष्ट मत आहे, तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिली नाही. महाराष्ट्रा सरकारला स्टे दिला, याचा अर्थ वकिलाची फौज उभी करण्यात हे सरकार कमी पडल आहे,” असे म्हणत दानवे यांनी सरकारवर ठपका ठेवला.

आमची सुरक्षा जनात करते

आमची सुरक्षा का हटवली हे त्यांनाच विचारले पाहिजे. पोलीस संरक्षण देते तेव्हा तेसरकार देत नसते. यासाठी सरकारने नेमलेली एक समिती असते. ती समती आढावा घेते. मग यांना काही धोका आहे का, याचा अहवाल पोलीस देते, मगच संरक्षण मिळते. त्यानंतर ही सुरक्षेत कपात केली, पण आम्हाला काही चिंता नाही. आमचा काही आक्षेप नाही, कारण आमचे सरंक्षण जनता करते, असे दानवे म्हाणाले. 

सत्तार काय म्हाणाले होते? 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पाडल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. विधानसभेत रावसाहेब दानवे यांनी धोका दिल्याचा  आरोप सत्तार यांनी केला होता. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जागा दाखवून दिल्याचे सत्तार म्हणाले. मी पुन्हा येईल. जे पुन्हा येईल बोलले होते ते आलेच नाही, पण मी पुन्हा येणार आहे, असे सत्तार म्हणाले होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com