पंधरा वर्षांत केली नाहीत, तेवढी कामे दोन वर्षांत केली : कोल्हेंचा आढळरावांवर निशाणा 

विमानतळपुन्हा खेडला येण्याची शक्‍यता नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूलही केले.
NCP MP Amol Kolhe criticizes former Shiv Sena MP Shivajirao Adhalrao Patil
NCP MP Amol Kolhe criticizes former Shiv Sena MP Shivajirao Adhalrao Patil

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात 15 वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती माझ्या खासदारपदाच्या गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केली आहेत, अशा शब्दांत शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघात शिवसेनेचे तीन टर्म खासदार असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. 6 मार्च) पिंपरी-चिंचवडमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात खासदार कोल्हे यांनी माजी खासदार तथा शिवसेना उपनेते आढळरावांना वरील टोमणा लगावला. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश मेहेत्रे आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

केंद्र सरकारने जीएसटीबाबत निर्णय घेताना घाई केल्याने त्याची झळ देशभरातील उद्योग धंद्यांबरोबरच पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्याला देखील बसल्याची टीका खासदार कोल्हे यांनी या वेळी केली. चाकण हे मल्टी मॉडेल हब होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असेही ते म्हणाले. बेलसरे व मेहेत्रे यांनी यावेळी लघुउद्योजकांच्या मांडलेल्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

खेडचा विमानतळ पुरंदरला गेल्याच्या प्रश्नावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी खासदारांनाच पुन्हा लक्ष्य केले. ही संधी आली होती. पण, ती कुणामुळे गेली, याचा याचा उहापोह न करता त्यावर आता पर्याय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, जिल्ह्यातच हा दुसरा विमानतळ होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, तो पुन्हा खेडला येण्याची शक्‍यता नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूलही केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मी लक्ष घातलेच आहे. पण, असे लक्ष घालणे म्हणजे केवळ राजकारण नाही, तर लोकांची अपेक्षापूर्ती करणे आहे, असे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

आपल्या पहिल्याच टर्ममधील दोन वर्षांचा लेखाजोगा मांडताना खासदार कोल्हे म्हणाले, ""चाकण-हिंजवडी मेट्रोचा डीपी प्लॅन, एमएसआरडीसीचा रिंगरोड, पुणे-नाशिक हायवेवरील चाकण, राजगुरुनगर, कळंब, मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथील बायपास दोन वर्षांत मार्गी लावले आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर-नगर या हायवेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहा हजार कोटी रूपये मंजूर केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com