इंद्रा साहनी मराठा आरक्षणालाच कशी आडवी येते?

इंद्रा साहनी केसतमिळनाडू व अन्य राज्यांना चालते अन् महाराष्ट्रालाच कशी आडवी येते?. सत्ताधारी पक्षाने केंद्राकडे बोट करू नये. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करू नये. दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण कसे देणार याचा मार्ग सांगावा. अन्यथा हा प्रश्न चिघळल्यास राजकारण करणाऱ्या दोन्ही घटकांची मोठी कोंडी होईल, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी केला.
Sambhajiraje
Sambhajiraje

नाशिक : इंद्रा साहनी केस (Indra Sawhney Case) तमिळनाडू व अन्य राज्यांना चालते अन् महाराष्ट्रालाच कशी आडवी येते?. सत्ताधारी पक्षाने केंद्राकडे बोट करू नये. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करू नये. दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण कसे देणार याचा मार्ग सांगावा. अन्यथा हा प्रश्न चिघळल्यास राजकारण करणाऱ्या दोन्ही घटकांची मोठी कोंडी होईल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आज येथे दिला.(Sambhajiraje Warns politicians on Maratha Reservation)  

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करून जबाबदारी ढकलतं आहे. परंतू आता मराठा समाजाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. आम्हाला कोर्टाच्या निकालातून काय मार्ग काढणार ते सांगा, अशी स्पष्ट ताकीद यावेळी त्यांनी दिली. ते म्हणाले, राज्यातील मराठा समाजातील जबाबदार घटकांशी चर्चा करून येत्या २७ मे रोजी मुंबईत राज्य शासन व विरोधी पक्ष दोघांशीही चर्चा करुन भुमिका जाहीर करू. त्यानंतर सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी त्या भुमिकेला पाठींबा न दिल्यास त्यांनाही ताकद दाखवू. त्यावेळी तुझं-माझं तुझं केले तर याद राखा धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. मी मराठा समाजाचे नेतृत्व करतं नाही. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्याचा पर्याय आमच्याकडे आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलतं होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मुद्यावर निकाल दिला. त्यानंतर केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलतं आहे. मागच्या सरकारने बोगस कायदा केला होता. या सरकारने न्यायालयात व्यवस्थित मांडणी केली नाही या आरोप-प्रत्यारोपांशी मराठा समाजाला काही देणे घेणे नाही. आता आम्हाला मार्ग हवा आहे. तो कसा काढता येईल याची चर्चा करावी. 

समाजातील जबाबदार घटकांशी चर्चा करून समाजाची भुमिका मांडणार आहे. २७ तारखे पर्यंत समाजाने शांत राहावे, राज्य सरकारने नाकारलेल्या आरक्षणातून मार्ग कसा काढता येईल याचा अभ्यास करावा. त्यानंतर जी भुमिका घेतली जाईल त्यातून कदापी माघार घेतली जाणार नाही. समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आडवा गेल्या शिवाय राहणार नाही.

सारथीतून शाहु महाराजांचे नाव काढा
सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२० पुर्वी करण्यात आलेल्या नियुक्त्या देण्याच्या सुचना दिल्या आहेत परंतू राज्य सरकार ते देत नाही, छत्रपती शाहु महाराजांच्या नावाने सारथी संस्था स्थापन केली परंतू त्या संस्थेची स्वायत्तता सरकारने मोडून काढली. तारादूत प्रकल्प मोडीत काढला. त्यामुळे सरकारने सारथी संस्थेला छत्रपती शाहु महाराजांचे दिलेले नाव काढून घ्यावे अशी मागणी खासदार भोसले यांनी करताना राज्य सरकारला जे शक्य आहे किमान ते तरी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चार वेळा भेट मागितली परंतू अद्यापही ती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली.


आंदोलन शिकविण्याची गरज नाही
कोरोनामुळे राज्याची परिस्थिती गंभीर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज यांचा वंशज असल्याने प्रथम लोकांच्या जीवाचा विचार करेन, याचा अर्थ मी आक्रमक नाही असा कोणी करू नये. सन २००७ पासून राज्य पिंजून काढले. समाजाच्या भावना जाणून घेतल्या त्यानंतर मैदानात उतरलो. महाराज शांत आहेत बोलणारे त्यावेळी कुठे होते. आक्रमक होण्यासाठी दोन मिनिटे देखील लागणार नाही. हि सामंज्यसाची भुमिका आहे. कारण नसताना टीम टीम करणायांनी आंदोलन कसे करायचे आम्हाला सांगण्याची गरज नाही असा टोला त्यांनी टिकाकारांना लगावला.
...
हेही वाचा...

मला आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com