व्यापारी म्हणतात, दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाहिजे !

शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून देशात नाशिक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवार (ता. १९) पासून स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय ऑनलाइन बैठकीत घेतला.
jANTA CURFEW
jANTA CURFEW

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून देशात नाशिक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवार (ता. १९) पासून स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय ऑनलाइन बैठकीत घेतला. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे बैठकीचा अहवाल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, नाशिककरांकडून शासनाच्या सौजन्याचादेखील गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. सातपूर विभागात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जनता कर्फ्यू लावण्याचा एकमुखी निर्णय घेतला.

हा निर्णय सातपूर विभागापुरताच न घेता संपूर्ण शहरासाठी घेतला जावा या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने मते जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांची ऑनलाइन बैठक बोलाविण्यात आली होती. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी भूमिका मांडली. प्रारंभी जनता कर्फ्यूसाठी पुढाकार घेतलेल्या नाशिक सिटीझन फोरमचे हेमंत राठी यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, गेल्यावर्षी शहरात कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र यावर्षी परिस्थिती भयानक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांना स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. दहा दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळून जनता कर्फ्यूत सहभागी व्हावे.

ऑनलाइन चर्चेत क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, रसिक बोथरा, अनिल लोढा, राजेश मालपुरे, सोनल दगडे, आनंद सूर्यवंशी, श्रीधर व्यवहारे, भावेश माणिक, श्याम रमैय्या, राजेंद्र फड, स्वप्नील जैन, विलास शिरोरे आदी साठहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. 
...
कर्फ्यूसंदर्भात मांडलेली मते 
प्रशासनावरचा ताण, मदत करण्याची प्रत्येकाची जबाबदारी 
फक्त प्रशासनावर जबाबदारी टाकून चालणार नाही. 
कोरोना लढाईत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे. 
कोरोना अटकावासाठी जे-जे आवश्यक आहे ते करावे. 
बंदमुळे आर्थिक झळ बसेल मात्र पर्याय नाही. 

...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com