शेती उध्वस्त करणारे विधेयक तात्काळ रद्द करा 

शेतकरी व शेती दोन्ही टिकले पाहिजेत. त्यांना मदतीची गरज आहे. मात्र सध्या केंद्र सरकारने जी विधेयके आणली आहेत, ती या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारी आहेत. त्याविरोधात देशभरात विरोध आंदोलन होत आहे. त्याला वाढता पाठींबा मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बीले मागे घ्यावीत.
शेती उध्वस्त करणारे विधेयक तात्काळ रद्द करा 

नाशिक : शेतकरी व शेती दोन्ही टिकले पाहिजेत. त्यांना मदतीची गरज आहे. मात्र सध्या केंद्र सरकारने जी विधेयके आणली आहेत, ती या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारी आहेत. त्याविरोधात देशभरात विरोध आंदोलन होत आहे. त्याला वाढता पाठींबा मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बीले मागे घ्यावीत. बाजार समित्यांची यंत्रणा टिकली तर शेतकऱ्यांच्या मालाला विक्रीची व्यवस्था व संरक्षण असेल, त्यामुळे केंद्र सरकारने शेती विधेयक तात्काळ रद्द करावे, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे गणेश देवी यांनी आज येथे केली. 

राष्ट्र सेवा देल आणि छात्र भारती यांसह विविध समाजवादी संघटनांतर्फे आज येथील बाजार समितीच्या सभागृहात केंद्र शासनाच्या शेती विधेयकाला विरोधासाठी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत बाजार समित्या टिकून रहाव्यात. कॉन्ट्रॅक्‍ट फार्मींग संदर्भात ग्रामपंचायत ग्रामसभांचे ठराव सक्तीचे करावेत, शेतावरील शेतकऱ्यांची मालकी टिकून रहावी आणि केंद्र सरकारने शेती विधेयक रद्द करावे हे मुलभूत मागणीचे ठराव करण्यात आले. 

आज सकाळी बाजार समितीच्या आवारात संघटनेने ढोल वाजवून आंदोलन केले. यावेळी शेती विधेयकाविरोधात मोठ्या प्रामणात घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्री. देवी म्हणाले, सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रात शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे कृषी विधेयक संसदेत मंजूर करुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात लुट होणार आहे. भांडवलदार व मोठे व्यवसायिक यांच्यासाठी शेतकऱ्यांवर आक्रमणाचा अप्रत्यक्ष मार्गच खुला केला आहे. या विधेयकाच्या माध्यमतून आम्ही काहीतरी नवीन करीत असल्याचा केंद्र सरकारचा देखावा आहे. पंरतू निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारची मक्तेदारी निर्माण होणार आहे. यापूर्वीही शेतकरी बाजार समिती बाहेर आपल्या शेती मालाची विक्री केली जात होतीच. मात्र कोणतीाह विचार न करता काही तरी नवीन बिनकामाचे उद्योग केंद्र सरकार करीत आहे. यातून कंत्राटी शेतीला खुली चालना मिळेल. लहान शेतकरी उध्वस्त होईल. बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या मालाची बाजारपेठ नष्ट होऊन मोठ्या भांडवलदारांच्या हाती तीचे नियंत्रण जाईल. कोणत्याही स्थितीत त्याचे समर्थन शक्‍य नाही. त्यामुळे ही विधेयके तात्काळ मागे घेण्यात यावीत. 

यावेळी विविध संगटनांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. अनिता पगारे, नितीन मते, अतुल देशमुख, सदाशिव गंगे, कल्याणी अनिता मनोहर, शरद कोकाटे, राकेश पवार आदींनी या मेळाव्याचे संयोजन केले. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com