badgujar-Kulkarni
badgujar-Kulkarni

हिंमत असेल तर, उड्डाणपुलाचे काम भाजपने थांबवून दाखवावे

त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौकापर्यंत नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिवसेनेत रंगलेला कलगीतुरा अद्याप संपुष्टात आलेला नाही. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हिंमत असेल तर भाजपने हे काम थांबवून दाखवावे, भाजपला असे आव्हान दिले आहे.

नाशिक : त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौकापर्यंत (Cidco flyover) नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिवसेनेत (Shivsena BJP Political war on Flyover issue) रंगलेला कलगीतुरा अद्याप संपुष्टात आलेला नाही. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar Challenges BJP Mayor) यांनी हिंमत असेल तर भाजपने हे काम थांबवून दाखवावे, भाजपला असे आव्हान दिले आहे.   

यासंदर्भात नुकतेच महापौर सतीश कुलकर्णी यांनी विकास कामांना निधी अपुरा पडतं असल्याने या पुलाचे काम थांबविण्याचे पत्र दिले. त्यावर शिवसेनेचे महानगर प्रमुख, नगरसेवक  बडगुजर यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम थांबविता येत नाही. यासंदर्भात महापौरांना कायदेशीर डोस देताना, हे काम थांबवूच शकतं नाही, काम थांबल्यास मी राजकारण सोडेन, असे आव्हान त्यांनी महापौरांना दिले आहे.

शहरात पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्रिमुर्ती चौक व मायको सर्कल येथे दोन प्रत्येकी सव्वाशे कोटी रुपये किमतीच्या दोन उड्डाणपुलाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. संबधित कामाच्या कार्यांरंभ आदेश दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांना एप्रिल महिन्यात पत्र लिहून विकासकामांसाठी निधी अपुरा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही पुल रद्द करण्याची सूचना केली होती. 

त्याअनुषंगाने शिवसेना नेते, नगरसेवक बडगुजर यांनी महासभेत महापौर कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला. त्रिमुर्ती चौकातील उड्डाणपुल या भागासाठी महत्वाचा आहे. त्याचे काम थांबविणे योग्य नाही. कामाचे कार्यारंभ आदेश दिले असल्याने अशा प्रकारे काम बंद करता येत नाही. महापौरांनी काम थांबवून दाखवावे, काम थांबल्यास मी राजकारण सोडेन असे आव्हान दिले.

त्यामुळे या निमित्ताने भाजप विरुध्द शिवसेना असे रणशिंग फुंकले गेले आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने यापुर्वी वाद झाला होता. भाजपकडून दोन्ही उड्डाणपुलांचे श्रेय घेतले जात असताना खासदार हेमंत गोडसे यांनी यापुर्वी केलेल्या मागणीच्या पत्राचा आधार घेत शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे पुल झाल्याचा दावा केला होता त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला होता.

...
एखाद्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ते काम थांबविता येत नाही. असे असताना महापौर कुलकर्णी यांनी काम थांबविण्याचे पत्र आयुक्तांना देणे चुकीचे आहे. ते आता काम थांबवू शकतं नाही. तसे झाल्यास मी राजकारण सोडेन. - सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख, शिवसेना.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com