"कोरोना'मुळे पुढील तीन महिने शिवभोजन फक्त पाच रुपयांत

लॉकडाउन उठविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र राज्यात अद्याप असामान्य परिस्थिती असल्यामुळे गरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्यात येणार आहे.
"कोरोना'मुळे पुढील तीन महिने शिवभोजन फक्त पाच रुपयांत

नाशिक : लॉकडाउन उठविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र राज्यात अद्याप असामान्य परिस्थिती असल्यामुळे गरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्यात येणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना दिलासा मिळणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये, यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला होता. या सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुणाचीही उपासमार होऊ नये, या उद्देशाने ही सवलत सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर नागरिकांच्या हालापेष्टा होत आहेत. त्यामुळे शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रतिथाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 30 रुपये प्रतिथाळी शासन देणार आहे. यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे, तसेच भोजनालय रोज निर्जंतुकीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्‍यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून द्यावे. जेवण तयार करण्यापूर्वी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता सप्टेंबरपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याने राज्यातील गरजू, गोरगरीब, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=uvwupo9gaLUAX-RYKQH&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=34357d24c1525f773106bb76adfc2ea2&oe=5F251D27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com