दिलासादायक.... नाशिक विभागात एक लाख ३२ हजार रुग्ण कोरोनामुक्त !

विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांत एक लाख ३२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. यशस्वी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सव्वीस हजार १७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिलासादायक.... नाशिक विभागात एक लाख ३२ हजार रुग्ण कोरोनामुक्त !

नाशिक : विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांत एक लाख ३२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. यशस्वी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सव्वीस हजार १७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे रुग्णांचे बरे होण्याचे प्रामण ८१.७४ टक्के आहे, ही दिलासादायक बाब आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसते आहे. परंतु या स्थितीतही आरोग्य विभाग व प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात देखील लक्षणीय सुधारणा होतांना दिसते आहे. 

विभागात आज पर्यंत एक लाख एकसष्ट हजार ५१८ रुग्णांपैकी एक लाख बत्तीस  हजार  २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सव्वीस हजार १७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात तीन हजार ३१५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. विभागात जरी रूग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.७४ टक्के आहे. मृत्युदर २.०५ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली.
नाशिकला बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के आहे. 

नाशिकला सर्वाधिक रुग्ण

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्रेपन्न हजार २०१रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नऊ हजार ६२८ रुग्णांवर उपचार सुर आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के इतके आहे. आजपर्यंत एक हजार १७३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जळगांवला बत्तीस हजार रुग्णांना डिस्चार्ज 
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत त्रेचाळीस हजार ८९९  कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील बत्तीस हजार ९४१ रुग्ण पुर्णपणे बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नऊ हजार ८५१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.०३ टक्के आहे. आजपर्यंत एक हजार १०७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

धुळे जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत अकरा हजार ६१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दहा हजार २२२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एक हजार ४१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०४ टक्के आहे. आजपर्यंत ३४७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

नगर जिल्ह्यात ४,३४१ रुग्ण
नगर जिल्ह्यात आजपर्यंत सदतीस हजार १२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बत्तीस हजार २०० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. चार  हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७४ टक्के इतके आहे. आजपर्यंत ५८० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

नंदुरबारला १,३१५ रुग्ण
नंदुरबार जिल्ह्यात नाशिक विभागातील सर्वात कमी रुग्ण आहे. येथे कोरोनाचा संसर्ग मर्यादीत स्वरुपात दिसून आला आहे. या आदिवासी जिल्ह्यांत प्रशासनाला त्याचा दिलासा आहे. या जिल्ह्यात आजपर्यंत चार हजार ८८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तीन हजार ४६३ रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार ३१५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.८७ टक्के आहे. आजपर्यंत १०८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ae86FeiIZH8AX_Wp025&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=2e04dfc563fd4f108365059c55a07047&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com